शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नीट परीक्षा रद्द करण्याबाबतच्या नव्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 07:08 IST

सर्व मुद्यांचे निराकरण झाले आहे

नवी दिल्ली : देशामध्ये १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नीट परीक्षा कोरोना साथीमुळे पुढे ढकलाव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी विनंती करणाऱ्या नव्या याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. नीट परीक्षेविषयीच्या सर्व मुद्द्यांचे आता निराकरण झाले आहे, असे सांगत न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिका सादर करण्यात आल्या होत्या.

नीट परीक्षेबाबत बिगरभाजप सरकार असलेल्या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सादर केलेल्या याचिकेसह काही याचिका सर्वोच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी फेटाळल्या होत्या. नीट परीक्षा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी एका आदेशाद्वारे मार्ग मोकळा करून दिला होता. या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती सहा राज्यांच्या मंत्र्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यानंतर नीट परीक्षेबाबत सादर झालेल्या नव्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, नीट परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून संबंधित यंत्रणेने चोख व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आता त्याबाबतच्या आक्षेपांचे निराकरणही झाले आहे. मूळ मुद्दा निकाली निघाला असल्याने नीट परीक्षेसंदर्भातील कोणतीही याचिका विचारात घेतली जाणार नाही.

बिहारमध्ये दोनच शहरांत परीक्षा केंद्रेयाचिकादारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी बिहारमधील परिस्थिती विशद केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये नीट परीक्षेसाठी फक्त गया व पाटणा या दोन शहरांतच परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी.

आणखी एका याचिकादारातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ के. टी. एस. तुलसी म्हणाले, कंटेनमेन्ट झोनमधील लोकांना घराबाहेर जाण्यासही परवानगी देण्यात येत नाही. मग त्या भागांमध्ये राहणारे विद्यार्थी कसे काय परीक्षा देऊ शकतील?

टॅग्स :examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय