शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

जामिनावरील जन्मठेपेच्या कैद्यास पुन्हा अटक होणार- सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 2:53 AM

पत्नीचा जाळून केला होता खून

मुंबई: अंगावर रॉकेल ओतून पत्नीला जाळून ठार मारल्याबद्दल जन्मठेप झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भगवान नथुजी श्रीरामे या आरोपीस सर्वोच्च न्यायालयाने अपिलाचा निर्णय होईपर्यंत जामिनावर सोडले होते. परंतु आता अपील फेटाळून जन्मठेप कायम केली गेल्याने भगवान यास पुन्हा अटक करून उर्व रित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात टाकावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.अन्य एका महिलेशी संबंध असलेल्या भगवान याने १९ एप्रिल १९९ रोजी पत्नी सरला हिला दारुच्या नशेत जाळून ठार मारले होते. त्यावेळी दिनेश व मंगेश हे त्यांचे तीन वर्षांहून कमी असलेले दोन मुलगेही भाजले होते. या खुनाबद्दल पुसद येथील सत्र न्यायालयाने भगवानला जानेवारी २००१ मध्ये जन्मठेप ठोठावली होती. त्याची ही शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल २००६ मध्ये कायम केली होती.भगवान ५ जून १९९९ पासून अटकेत होता. सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यावर त्याने तेथे जामिनासाठी अर्ज केला. तोपर्यंत त्याची ११ वर्षे पाच महिने २४ दिवसांची शिक्षा भोगून झाली आहे, असा अहवाल अमरावती जिल्ह्यातील मोरशी कारागृह अधीक्षकांनी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०११ मध्ये भगवानला १० हजार रुपयांच्या जामिनावर सोडले होते. हा जामीन अपिलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत होता व दरम्यानच्या काळात भगवानला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पुसदच्या सत्र न्यायालयात हजेरी लावायचीहोती.आता अंतिम सुनावमीनंतर न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने भगवानचे अपील फेटाळून त्याची जन्मठेप कायम केली. त्याचप्रमाणे त्याचा जामीन रद्द करून त्यास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा अटक करण्याचा आदेश दिला. परिणामी गेली आठ वर्षे बाहेर राहिलेल्या भगवानला आता पुन्हा तुरुंगात जावे लागेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय