शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कंपन्यांनी कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावेत; गुजरात सरकारचा आदेश SCकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 16:20 IST

supreme court quashes gujarat govt notification तसेच सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत ओव्हरटाइमचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.

कामगारांबाबत गुजरात सरकारने दिलेली अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. कामगारांना ओव्हरटाइम वेतन न देता अतिरिक्त कामे करावी लागतील, असं राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था आणखी बिकट झाली आहे, अशा परिस्थितीत मजुरांना वेळेत पगार न मिळणे यामागील एक कारण असू शकते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत ओव्हरटाइमचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कोरोना लॉकडाऊनदरम्यान कामगारांना तीव्र आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे कामगारांना आपले उदरनिर्वाहाच्या साधनांवर पाणी सोडावे लागत आहे. त्यातच हा कायदा जगण्याच्या आणि सक्तीच्या मजुरीच्या हक्कांच्या विरोधात वापरता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या 17 एप्रिलच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, उद्योगांना लॉकडाऊनच्या कालावधीत कारखाना अधिनियमांतर्गत काही विशिष्ट अटींमधून सूट देण्यात आली. यात कामगारांना 6 तासांच्या अंतराने 30 मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार असून, पुढील काम 6 तास केले जाईल. म्हणजेच मजुराला 12 तास काम करावे लागेल. अधिसूचनेत नमूद केले आहे की, त्याला मजुरीत केलेल्या जादा कामासाठीही केवळ सामान्य वेतन दिले जाईल. कारखाना कायद्याच्या कलमांन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यायोगे सार्वजनिक आणीबाणीच्या वेळी सरकार कारखान्यांना कारखाना कायद्याच्या कक्षेतून मुक्त करू शकते.या कलमानुसार, सार्वजनिक आणीबाणीचा अर्थ गंभीर आपत्कालीन परिस्थिती आहे, जी युद्ध किंवा बाह्य आक्रमकता किंवा अंतर्गत गडबड असो की भारताची सुरक्षा धोक्यात आणते. कोर्टाने म्हटले आहे की सरकार कलमांन्वये उद्योगांना सूट देऊ शकत नाही, कारण साथीच्या रोगाला सार्वजनिक आपात्कालीन परिस्थिती मानले जाऊ शकत नाही. तसेच 20 एप्रिल ते 19 जुलै या कालावधीत सर्व मजुरांना त्यांचे ओव्हरटाइम वेतन द्यावे, असेही कोर्टाने निर्देश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGujaratगुजरात