शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'तुम्ही नीट काम केलं असतं तर ताजमहालाची ही स्थिती झाली नसती'- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:24 IST

पुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- ताज महालच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभाग योग्यप्रकारे काम करत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ताजमहालाच्या परिसरामध्ये कीडे आढळून आल्याबद्दलही न्यायालयाने काळजी व्यक्त केली. हे थांबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाने काय केले असे न्यायालयाने विचारलं.पुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. या कामासाठी पुरातत्त्व विभागाची गरज आहे की नाही हे तुम्ही (केंद्र सरकार) ठरवा अशा कडक शब्दांमध्ये न्यायाधीश एम. बी. लोकूर, दीपक गुप्ता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.गेल्या सुनावणीच्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ताज महालाची काळजी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेता येणे शक्य आहे का असा प्रश्न विचारला होता. त्याला नाडकर्णी यांनी केंद्रीय पयार्वरण आणि वन खाते सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवर विचार करत असल्याचे सांगितले. तर यमुनेचे पाणी साचून राहिल्यामुळे किडे आढळून येत असल्याचे पुरातत्त्व विभागाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले.

टॅग्स :Taj MahalताजमहालIndiaभारत