शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

ब्रिटिशांनी पाकिस्तानमध्ये जप्त केलेल्या जमिनीपोटी ५ कोटी द्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 08:12 IST

सदर रक्कम चार आठवड्यात देण्याचे निर्देश दिले असून, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची शिक्षा म्हणून ब्रिटिश सरकारने जप्त केलेल्या पाकिस्तानातील जमिनीच्या बदल्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला ५ कोटी भरपाई देण्याचे आदेश भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

एस. संपूर्णसिंह यांनी ब्रिटिश सरकारविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची त्यावेळच्या अखंड भारतातील पण सध्या पाकिस्तानात असलेली ५० एकर जमीन, ब्रिटिश सरकारने जप्त केली होती. स्वातंत्र्यानंतर एस. संपूर्णसिंह यांची पाकिस्तानमध्ये भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती .

स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी पंजाब सरकारला ब्रिटिशांनी त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत मिळावी म्हणून मागणी केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान, तुरुंगवासाचा आणि जमीन जप्तीचा तपशीलही सादर केला. ऑगस्ट १९५८ मध्ये त्यांचे निधन झाले. ७० च्या दशकाच्या मध्यात त्यांच्या पत्नीला हा पत्रव्यवहार सापडला आणि तिने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. १९८६ मध्ये त्यांना यात यश आले. ५० एकर जमिनीच्या बदल्यात पंजाब सरकारने ७२,०५० रुपये मंजूर केले होते.

तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेविरुद्ध त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत ५० एकर जमिनीचे बदल्यात तितकीच जमीन किंवा जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. हायकोर्टाने त्यांची याचिका मान्य करत पंजाब सरकारला पर्यायी जमीन देण्याचे निर्देश दिले. या आदेशाला पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. 

पंजाब सरकारने असा दावा करण्याचा प्रयत्न केला की, एस. संपूर्णसिंह यांनी ब्रिटिश स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता व ब्रिटिश सरकारने त्यांची जमीन जप्त केली होती, हे सिद्ध झालेले नाही. संपूर्णसिंह यांच्याकडे त्यावेळी ५० एकर जमीन असल्याबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली. सरकारने देऊ केलेली रक्कम सहानुभूतीपोटी आहे, असेही सांगण्यात आले. 

दरम्यान, संपूर्णसिंह यांच्या विधवा पत्नीचाही मृत्यू झाला. नंतर त्यांच्या मुलाने सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण लावून धरले. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी.आर. गवई यांनी पंजाब सरकारचे म्हणणे फेटाळले.

चार आठवड्यांत रक्कम देण्याचे निर्देश

एस. संपूर्णसिंह यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यांची त्यावेळच्या अखंड भारतातील पण सध्या पाकिस्तानात असलेली ५० एकर जमीन ब्रिटिश सरकारने जप्त केली होती. खंडपीठाने एस. संपूर्णसिंह यांच्या मालकीच्या ब्रिटिशांनी जप्त केलेल्या जमिनीची किंमत ७२,०५० रु. या तुटपुंज्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे मान्य केले; मात्र आता खूप उशीर झाला आहे. मागणी प्रमाणे जालंधरमध्ये इतकी जमीन देणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन, सरकारने निश्चित केलेल्या नुकसानभरपाईमध्ये रु. ५ कोटी इतकी वाढ करत ४ आठवड्यात ही रक्कम संपूर्णसिंह यांच्या मुलाला देण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय