शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

ब्रिटिशांनी पाकिस्तानमध्ये जप्त केलेल्या जमिनीपोटी ५ कोटी द्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 08:12 IST

सदर रक्कम चार आठवड्यात देण्याचे निर्देश दिले असून, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची शिक्षा म्हणून ब्रिटिश सरकारने जप्त केलेल्या पाकिस्तानातील जमिनीच्या बदल्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला ५ कोटी भरपाई देण्याचे आदेश भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

एस. संपूर्णसिंह यांनी ब्रिटिश सरकारविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची त्यावेळच्या अखंड भारतातील पण सध्या पाकिस्तानात असलेली ५० एकर जमीन, ब्रिटिश सरकारने जप्त केली होती. स्वातंत्र्यानंतर एस. संपूर्णसिंह यांची पाकिस्तानमध्ये भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती .

स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी पंजाब सरकारला ब्रिटिशांनी त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत मिळावी म्हणून मागणी केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान, तुरुंगवासाचा आणि जमीन जप्तीचा तपशीलही सादर केला. ऑगस्ट १९५८ मध्ये त्यांचे निधन झाले. ७० च्या दशकाच्या मध्यात त्यांच्या पत्नीला हा पत्रव्यवहार सापडला आणि तिने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. १९८६ मध्ये त्यांना यात यश आले. ५० एकर जमिनीच्या बदल्यात पंजाब सरकारने ७२,०५० रुपये मंजूर केले होते.

तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या रकमेविरुद्ध त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत ५० एकर जमिनीचे बदल्यात तितकीच जमीन किंवा जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. हायकोर्टाने त्यांची याचिका मान्य करत पंजाब सरकारला पर्यायी जमीन देण्याचे निर्देश दिले. या आदेशाला पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. 

पंजाब सरकारने असा दावा करण्याचा प्रयत्न केला की, एस. संपूर्णसिंह यांनी ब्रिटिश स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता व ब्रिटिश सरकारने त्यांची जमीन जप्त केली होती, हे सिद्ध झालेले नाही. संपूर्णसिंह यांच्याकडे त्यावेळी ५० एकर जमीन असल्याबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली. सरकारने देऊ केलेली रक्कम सहानुभूतीपोटी आहे, असेही सांगण्यात आले. 

दरम्यान, संपूर्णसिंह यांच्या विधवा पत्नीचाही मृत्यू झाला. नंतर त्यांच्या मुलाने सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण लावून धरले. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी.आर. गवई यांनी पंजाब सरकारचे म्हणणे फेटाळले.

चार आठवड्यांत रक्कम देण्याचे निर्देश

एस. संपूर्णसिंह यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यांची त्यावेळच्या अखंड भारतातील पण सध्या पाकिस्तानात असलेली ५० एकर जमीन ब्रिटिश सरकारने जप्त केली होती. खंडपीठाने एस. संपूर्णसिंह यांच्या मालकीच्या ब्रिटिशांनी जप्त केलेल्या जमिनीची किंमत ७२,०५० रु. या तुटपुंज्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे मान्य केले; मात्र आता खूप उशीर झाला आहे. मागणी प्रमाणे जालंधरमध्ये इतकी जमीन देणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन, सरकारने निश्चित केलेल्या नुकसानभरपाईमध्ये रु. ५ कोटी इतकी वाढ करत ४ आठवड्यात ही रक्कम संपूर्णसिंह यांच्या मुलाला देण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय