शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

"सध्या आम्ही काहीही बोलणार नाही", बिहार जात जनगणनेवर सर्वोच्च न्यायालयाचे मत, आता पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:44 IST

बिहारच्या जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला होता. 

नवी दिल्ली : जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. मात्र, बिहारच्या जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला होता. 

राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केल्यानंतर याचिकाकर्त्याने आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. यावेळी बिहार सरकारने जात जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक केली आहे, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, "या प्रकरणावर सध्या भाष्य करणार नाही. हे प्रकरण ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे, त्यावेळी आम्ही त्यावर सुनावणी करू". दरम्यान, ही याचिका 'युथ फॉर इक्वॅलिटी' आणि 'एक सोच एक प्रयास' या गैर-सरकारी संस्थांची आहे. याआधीच्या सुनावणीत बिहार सरकारने डेटा सार्वजनिक न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले नाहीत, तर आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आली होती.

बिहार सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी (दि.२) जात आधारित जनगणना २०२२ च्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. ते म्हणाले, बिहारची लोकसंख्या १३ कोटी ७ लाख २५ हजार ३१० आहे. त्यात २ कोटी ८३ लाख ४४ हजार १६० कुटुंबे आहेत. अनुसूचित जाती १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती १.६८ आणि सामान्य प्रवर्ग १५.५२ टक्के आहेत. बिहारमध्ये सुमारे ८२ टक्के हिंदू व १७.७ टक्के मुस्लिम आहेत.

२०११ ते २०२२ दरम्यान बिहारमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, हिंदू लोकसंख्या ८२.७ टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या १६.९ टक्के होती. ईबीसी ३६ टक्के, ओबीसी २७  टक्के आहेत. त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या यादव (१४.२६) यांची आहे. ब्राह्मण ३.६५ टक्के, राजपूत (ठाकूर) ३.४५ टक्के आहेत. सर्वांत कमी ०.६० टक्के कायस्थ आहेत. सध्या नोकऱ्यांमध्ये १८ टक्के आरक्षण दिले जाते. २७ टक्के ओबीसींना १२ टक्के आरक्षण दिले जाते. गणनेनुसार, बिहारमध्ये उच्च जातींची संख्या १५.५२ टक्के आहे.  

टॅग्स :BiharबिहारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय