शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

NOTAला सर्वाधिक मतदान झाल्यास निवडणूक रद्द करायची का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 15:52 IST

केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली: एखाद्या मतदारसंघात मतदारांनी सर्वाधिक पसंती 'नोटा'ला (NOTA- यापैकी कोणीही नाही) दिल्यास तर त्या ठिकाणी झालेली निवडणूक रद्द करून तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे. या संदर्भात न्यायालयानं निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटिस पाठवली आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला एकही उमेदवार पसंत नसल्यास मतदार नोटाचा पर्याय निवडतात. मात्र सध्या तरी त्यामुळे फारसा फरक पडत नाही. नोटाला सर्वाधिक मतं मिळाली, तरी तिथे पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद नाही. त्यामुळे सर्वाधिक नोटाला मिळाली, तरीही तिथे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेला उमेदवार विजयी घोषित होतो. याच विषयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.नोटाला सर्वाधिक मतदान झाल्यास तिथे पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. आज या प्रकरणी सुनावणी झाली. '९९ टक्के मतदारांनी नोटाला कौल दिला, तरीही त्याला महत्त्व नाही. अशा परिस्थितीत उर्वरित केवळ १ टक्का मतदार निवडणूक कोण जिंकणार ते ठरवतील,' असं याचिकाकर्त्यांचे वकील मानेका गुरुस्वामींनी न्यायालयाला सांगितलं.सर्वाधिक मतदान नोटाला झालं असल्यास तिथे फेरनिवडणूक घ्यायला हवी. लोकांच्या मताचा आदर व्हायला हवा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर असं झाल्यास त्या मतदारसंघातून कोणताही उमेदवार जिंकणार नाही. ती जागा रिकामी राहील. मग संसद, विधानसभा अस्तित्वात कशी येणार, असा सवाल सरन्यायाधीश बोबडेंनी उपस्थित केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग