शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:35 IST

भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. बागची आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत देशात समान नागरी संहिता (Uniform Civil Code) लागू करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम महिलांना वारसा हक्कात समान अधिकार मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली.

विधिमंडळाने निर्णय घ्यावा: न्यायालय

बार अँड बेंचच्या अहवालानुसार, भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. बागची आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी म्हटले की, वैयक्तिक कायदे थेट अमान्य ठरवल्यास कायदेशीर पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा विषय विधिमंडळाच्या विवेकावर सोपवणे अधिक योग्य ठरेल, जेणेकरून संसद समान नागरी संहितेबाबत स्वतंत्र कायदा करू शकेल. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनीही या मताशी सहमती दर्शवली. 

1937 च्या कायद्यावरील याचिका

या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत) अ‍ॅक्ट, 1937 या कायद्याला आव्हान दिले आहे. या कायद्यामुळे वारसा हक्कांसारख्या बाबींमध्ये मुस्लिम महिलांवर भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने सांगितले की, हा कायदा रद्द केल्यास पुढे कोणता कायदा लागू होईल, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होईल. मुख्य न्यायाधीशांनी विचारले की, जर 1937 चा कायदा रद्द केला, तर त्याऐवजी कोणता कायदा लागू होईल? त्या परिस्थितीत कायदेशीर पोकळी निर्माण होणार नाही का?

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितले की, शरीयत कायद्यानुसार महिलांना वारशात पुरुषांच्या तुलनेत निम्मा हिस्सा मिळतो. हा भेदभाव दूर करण्यासाठी 1937 चा कायदा असंवैधानिक ठरवला जाऊ शकतो. त्यांच्या मते, जर हा कायदा रद्द झाला तर इंडियन सक्सेशन अ‍ॅक्ट लागू होईल. या कायद्यानुसार वारसा हक्कांमध्ये स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले जातात.

भूषण यांनी पुढे सांगितले की, वारसा हा नागरी हक्क आहे. तो धार्मिक प्रथा नाही, त्यामुळे त्याला संविधानाच्या कलम 25 अंतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. मात्र न्यायालयाने या विषयावर तातडीने हस्तक्षेप करण्याबाबत सावध भूमिका घेतली. सुधारणा करण्याच्या घाईत मुस्लिम महिलांचे विद्यमान हक्कही कमी होऊ शकतात, अशी शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. मुख्य न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवताना म्हटले की, सुधारणांच्या अति उत्साहात आपण महिलांना सध्या मिळत असलेले हक्कही गमावू शकतो. त्यामुळे या विषयावर विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

याचिका दुरुस्त करण्याचा सल्ला

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांची याचिका दुरुस्त करून पर्यायी उपाय सुचवण्याचा सल्ला दिला. यामागचा उद्देश म्हणजे देशातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करणे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. महिलांच्या एका वर्गाला जर त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असेल, तर ते हक्क परत मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे, असेही मुख्य न्यायाधीशांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court: Time to implement Uniform Civil Code in India.

Web Summary : The Supreme Court suggests implementing a Uniform Civil Code, advocating equal rights for women in inheritance. The court advises the legislature to enact a law, ensuring comprehensive reform and preventing legal gaps.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUniform Civil Codeसमान नागरी कायदा