शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडून देण्यातील अडसर दूर, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 04:28 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन, मुरुगन आणि सन्थान या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास आक्षेप घेणारी गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्याने या तिघांच्या मुक्ततेमधील अडसर दूर झाला आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या ए. जी. पेरारीवलन, मुरुगन आणि सन्थान या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यास आक्षेप घेणारी गेली पाच वर्षे प्रलंबित असलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्याने या तिघांच्या मुक्ततेमधील अडसर दूर झाला आहे.श्रीपेरम्बदूर येथील स्फोटात राजीव गांधी यांच्यासह १६ जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही त्यावेळच्या जयललिता सरकारने या तिन्ही मारेकऱ्यांना सोडण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतला होता. मरण पावलेल्या इतरांपैकी सहा जणांच्या कुटुंबीयांनी त्याविरुद्ध केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती.ही याचिका गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा या कैद्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी आता ही याचिका निरर्थक झाली असल्याचे निदर्शनास आणले. त्यांचे म्हणणे होते की, २०१४ च्या मुक्ततेच्या निर्णयास केंद्र सरकारने आक्षप घेतला होता. केंद्राच्या तपास यंत्रणेने अभियोग चालविलेल्या खटल्यातील कैद्यांना राज्य सरकार, केंद्राच्या संमतीविना परस्पर सोडू शकत नाही, असे केंद्राचे म्हणणे होते. नंतर हा विषय घटनापीठाकडे गेला. घटनापीठाने केंद्राच्या बाजूने निकाल दिला. तामिळनाडू सरकारने त्यानंतर केंद्राकडे संमती मागितली; पण ती नाकारली गेली.त्याविरुद्ध तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली व न्यायालयाने राज्यपाल हा निर्णय घेऊ शकतात, असा निकाल दिला. आता नव्याने निर्णय घेण्यात आल्याने २०१४ चा निर्णय व त्यास दिलेले आव्हान निरर्थक झाले आहे. अ‍ॅड. शंकरनारायणन यांचा हा युक्तिवाद मान्य करून खंडपीठाने प्रलंबित याचिका निकाली काढली.काय आहे प्रकरण ?हे तिन्ही खुनी गेली २८ वर्षे कैदेत आहेत. त्यांना मुळात फाशीची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने विलंबाच्या कारणाने फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप दिली. कैद्यांना मुदतपूर्व सोडण्याच्या दंड प्रक्रिया संहितेमधील तरतुदीचा आधार घेत तामिळनाडू सरकारने गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी या तिघांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. तसा औपचारिक आदेश काढण्यासाठी प्रकरण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पाठविले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राज्यपालांनी त्यावर अद्याप कारवाई केली नव्हती. आता तो अडसर दूर झाला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी