शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बारावी निकालाच्या निकषांची माहिती दोन आठवड्यांत द्या- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:01 IST

परीक्षा रद्द केल्याबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करणार, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? याची माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई व आयसीएसईला दिला आहे. कोरोना साथीमुळे यंदा सीबीएसईची बारावीची परीक्षा न घेण्याच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला. बारावीचे निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करायचे याची माहिती सादर करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने गुण द्यावेत याची पद्धती ठरविण्यासाठी कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या संस्थेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयएससीईची विनंती सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दिनेश महेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने अमान्य केली.  विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केली असून, त्यामुळे १.२ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. आधी बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या पद्धतीने लावायचे, हा प्रश्न सोडविला जाईल. सर्वांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. केंद्रातर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सीआयएससीईचे वकील जे. के. दास यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय