शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बारावी निकालाच्या निकषांची माहिती दोन आठवड्यांत द्या- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:01 IST

परीक्षा रद्द केल्याबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करणार, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? याची माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई व आयसीएसईला दिला आहे. कोरोना साथीमुळे यंदा सीबीएसईची बारावीची परीक्षा न घेण्याच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला. बारावीचे निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करायचे याची माहिती सादर करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने गुण द्यावेत याची पद्धती ठरविण्यासाठी कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या संस्थेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयएससीईची विनंती सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दिनेश महेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने अमान्य केली.  विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केली असून, त्यामुळे १.२ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. आधी बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या पद्धतीने लावायचे, हा प्रश्न सोडविला जाईल. सर्वांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. केंद्रातर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सीआयएससीईचे वकील जे. के. दास यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय