शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बारावी निकालाच्या निकषांची माहिती दोन आठवड्यांत द्या- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:01 IST

परीक्षा रद्द केल्याबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करणार, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? याची माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई व आयसीएसईला दिला आहे. कोरोना साथीमुळे यंदा सीबीएसईची बारावीची परीक्षा न घेण्याच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला. बारावीचे निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करायचे याची माहिती सादर करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने गुण द्यावेत याची पद्धती ठरविण्यासाठी कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या संस्थेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयएससीईची विनंती सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दिनेश महेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने अमान्य केली.  विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केली असून, त्यामुळे १.२ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. आधी बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या पद्धतीने लावायचे, हा प्रश्न सोडविला जाईल. सर्वांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. केंद्रातर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सीआयएससीईचे वकील जे. के. दास यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय