शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

Sedition Law: “हीच ती वेळ! सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापर होतोय, देशद्रोहाचा कायदा रद्द करावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:51 IST

Sedition Law: देशद्रोहाच्या कायद्याबाबत बोलताना माजी न्यायमूर्तींनी केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारवरही परखड शब्दांत ताशेरे ओढलेत.

मुंबई: देशात अस्तित्वात असलेल्या देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा, आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. याआधीही देशद्रोहाचा कायदा असवा की नसावा, याबाबत चर्चा झडल्या आहेत. यातच आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी देशद्रोहाच्या कायद्याबाबत भाष्य केले आहे. देशद्रोहाच्या कायद्याचा वापर सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात केला जात असून, तो आता रद्दच करावा, असे न्या. नरीमन यांनी म्हटले आहे. 

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना न्या. नरीमन यांनी यासंदर्भात आपली रोखठोक मते मांडली आहेत. सरकारच्या टीकाकारांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहासंदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परावनगी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे न्या. नरीमन यांनी म्हटले आहे. 

चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात आहेत. मात्र त्याचवेळेस चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही, असे सांगत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एका विशेष समाजाचा नरसंहार करण्याचे आवाहन काही लोकांकडून केले जात असतानाही अशा लोकांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. अधिकाऱ्यांमध्येही याबद्दल उदासीनता दिसून येत आहे. दुर्देवाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील उच्च स्तरावरील लोक केवळ या अयोग्य भाषेच्या वापरासंदर्भात शांत आहेत असे नाही तर ते या गोष्टींचे जवळजवळ समर्थन करताना दिसत आहेत, अशी खंतही न्या. नरीमन यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, माजी न्यायमूर्ती असणाऱ्या नरीमन यांनी तिरुवनंतपुरममध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अयोग्य भाषाचे वापर संविधानाला धरुन नसल्याचे मत व्यक्त केल्याबद्दल समाधान वाटल्याचे म्हटले आहे. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित प्रकरण देशद्रोहाचे नसल्याचा निकाल दिला होता.  

टॅग्स :seditionदेशद्रोहSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार