शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sedition Law: “हीच ती वेळ! सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापर होतोय, देशद्रोहाचा कायदा रद्द करावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:51 IST

Sedition Law: देशद्रोहाच्या कायद्याबाबत बोलताना माजी न्यायमूर्तींनी केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारवरही परखड शब्दांत ताशेरे ओढलेत.

मुंबई: देशात अस्तित्वात असलेल्या देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा, आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. याआधीही देशद्रोहाचा कायदा असवा की नसावा, याबाबत चर्चा झडल्या आहेत. यातच आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी देशद्रोहाच्या कायद्याबाबत भाष्य केले आहे. देशद्रोहाच्या कायद्याचा वापर सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात केला जात असून, तो आता रद्दच करावा, असे न्या. नरीमन यांनी म्हटले आहे. 

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना न्या. नरीमन यांनी यासंदर्भात आपली रोखठोक मते मांडली आहेत. सरकारच्या टीकाकारांविरोधात हा कायदा वापरला जात असल्याचा संदर्भ देत देशद्रोहासंदर्भातील कायदा संपुष्टात आणण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला पूर्ण परावनगी देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे न्या. नरीमन यांनी म्हटले आहे. 

चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात आहेत. मात्र त्याचवेळेस चुकीची भाषा वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही, असे सांगत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एका विशेष समाजाचा नरसंहार करण्याचे आवाहन काही लोकांकडून केले जात असतानाही अशा लोकांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. अधिकाऱ्यांमध्येही याबद्दल उदासीनता दिसून येत आहे. दुर्देवाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील उच्च स्तरावरील लोक केवळ या अयोग्य भाषेच्या वापरासंदर्भात शांत आहेत असे नाही तर ते या गोष्टींचे जवळजवळ समर्थन करताना दिसत आहेत, अशी खंतही न्या. नरीमन यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, माजी न्यायमूर्ती असणाऱ्या नरीमन यांनी तिरुवनंतपुरममध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अयोग्य भाषाचे वापर संविधानाला धरुन नसल्याचे मत व्यक्त केल्याबद्दल समाधान वाटल्याचे म्हटले आहे. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित प्रकरण देशद्रोहाचे नसल्याचा निकाल दिला होता.  

टॅग्स :seditionदेशद्रोहSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार