शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:09 IST

भाजपच्या खासदाराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्याला पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले.

Supreme Court: मध्य प्रदेशच्या खांडवा-बुऱ्हाणपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान व्यवसायाने वकील असलेले अपक्ष उमेदवार मनोजकुमार अग्रवाल यांनी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरोधात जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सत्य लपवून खोटी माहिती दिली आहे, असे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटलं होतं. जबलपूर हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही सर्वोच्च न्यायालयाने अग्रवाल यांची याचिका फेटाळत त्यांना सल्ला दिला.

खांडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अपक्ष उमेदवार मनोज कुमार अग्रवाल यांची याचिका फेटाळताना पुढील निवडणुकीची तयारी करा असा सल्ला दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा संदर्भ देत याचिकाकर्त्याला तुम्ही खासदार होऊनही वकिली करु शकता असं म्हटलं.

गेल्या वर्षी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मनोज कुमार अग्रवाल यांची याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे म्हणत फेटाळली होती. ज्ञानेश्वर पाटील हे मध्य प्रदेश पॉवरलूम विव्हर्स कोऑपरेटिव्ह युनियन, बुरहानपूरचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांनी उमेदवारी अर्जात याबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र पटेल यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकाकर्ते मनोजकुमार अग्रवाल यांनी केली होती.

उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी योग्य नसल्याचे ठरवत फेटाळली होती. यंत्रमाग विणकर सहकारी संघ राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो की नाही हे याचिकाकर्त्याला स्पष्ट करता आलेले नाही. तसेच २०२० मध्ये जेव्हा ज्ञानेश्वर पाटील अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा ते भ्रष्टाचारामुळे होते की अन्य काही कारणांमुळे होते हे या याचिकेतून स्पष्ट झालेले नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मनोज कुमार अग्रवाल सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याने पुढील निवडणुकीची तयारी करावी, असे सांगितले. "भाजप उमेदवाराला ८ लाखांहून अधिक मते मिळाली आणि तुम्हाला ४००० मतं मिळाली. त्यामुळे पुढच्या निवडणुकीची तयारी करा," असं सर्वोच्च न्यायलयाने सांगितले.

"वकिलांकडे अशीही सोय आहे की ते खासदार झाल्यानंतरही वकिली सुरू ठेवू शकतात. तुम्ही कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांना बघा. पुढील निवडणुकांसाठी आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत," असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा