शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यांत निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 05:23 IST

निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : पाऊस कमी होत असलेल्या जिल्ह्यांत नागरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सूचित केले आहे. 

निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यांत नंतर निवडणुका घेता येऊ शकतात. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाला नागरी व स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश ४ मे रोजी दिले होते. नंतर राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोर्टाने प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.

आयोगाने समोर मांडल्या अडचणी

- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या निवडणुका पावसाळ्यात होणार का, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले होते. 

- राज्य निवडणूक आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेण्यात कोणकोणत्या प्रशासकीय अडचणी समोर आहेत, हे सुप्रीम कोर्टात अर्जाद्वारे नमूद केले. 

- त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर मंगळवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली.

प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा

प्रभागांचे परिसीमन करणे आणि निवडणूक वेळापत्रक ठरविण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने दोन कायदे संमत करून स्वत:कडे घेतल्यानंतर १० मार्चरोजी निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरु करता येणार आहे. मुंबई व कोकण विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण खूपच जास्त असते. त्या तुलनेत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी असते. राज्यात १५ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २१० नगरपंचायती तसेच १९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इतक्या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान २ ते ३ टप्प्यांत घ्याव्या लागतील.

हवामान खात्याच्या अंदाजावर निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालावर राज्य निवडणूक आयोगाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्याच्या कोणत्याही भागात तातडीने निवडणुका जाहीर केल्या जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज, इतर आकडेवारी व अधिकृत माहितीच्या आधारावर निर्णय घेतला जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी पत्रकारांना सांगितले.

सप्टेंबर-ऑक्टोबरध्ये सरसकट निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मान्य केला नाही, पण फेटाळलाही नाही. मी स्वत: एकटा निर्णय घेऊ शकत नाही. सर्व संबंधित बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल. - यु.पी.एस. मदान, निवडणूक आयुक्त 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग