शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 08:47 IST

Supreme Court: स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असे कोर्टाचे म्हटले आहे. रस्ता अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या पालकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

१८ जून २०१४ रोजी, एनएस रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मिडिया रिपोर्टनुसार, रवीश वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला. मल्लासंद्रा गावापासून अरासीकेरेदरम्यान हा अपघात झाला.

 या अपघातात रवीश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविशची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हा बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले. मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीशच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला. 

नंतर, त्यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आणि दावा केला की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. यावर हायकोर्टाने म्हटले की, "मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधीच्या वतीने दावा केला जातो, तेव्हा हे सिद्ध करणे आवश्यक आहे की मृत व्यक्ती निष्काळजीपणे गाडी चालवण्यास जबाबदार नाही. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला आणि त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत."

सुप्रीम कोर्टाचा कुटुंबियांना दिलासा देण्यास नकारन्यायाधीश पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन या याचिकेवर सुनावणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की,  स्वत: चुकीमुळे अपघात होतो, तेव्हा मृताचे कुटुंबीय विमान कंपनीकडे भरपाई मागू शकत नाहीत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटकAccidentअपघात