शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
5
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
6
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
7
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
8
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
9
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
10
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
11
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
12
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
13
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
14
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
15
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
16
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
17
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
18
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
19
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
20
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर

बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 08:47 IST

Supreme Court: स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असे कोर्टाचे म्हटले आहे. रस्ता अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या पालकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

१८ जून २०१४ रोजी, एनएस रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मिडिया रिपोर्टनुसार, रवीश वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला. मल्लासंद्रा गावापासून अरासीकेरेदरम्यान हा अपघात झाला.

 या अपघातात रवीश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविशची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हा बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले. मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीशच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला. 

नंतर, त्यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आणि दावा केला की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. यावर हायकोर्टाने म्हटले की, "मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधीच्या वतीने दावा केला जातो, तेव्हा हे सिद्ध करणे आवश्यक आहे की मृत व्यक्ती निष्काळजीपणे गाडी चालवण्यास जबाबदार नाही. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला आणि त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत."

सुप्रीम कोर्टाचा कुटुंबियांना दिलासा देण्यास नकारन्यायाधीश पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन या याचिकेवर सुनावणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की,  स्वत: चुकीमुळे अपघात होतो, तेव्हा मृताचे कुटुंबीय विमान कंपनीकडे भरपाई मागू शकत नाहीत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटकAccidentअपघात