शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सरकारं दिवसेंदिवस न्यायाधीशांच्या प्रतिमा मलीन करताहेत, ही परिस्थिती दुर्देवी; सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:15 IST

सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी पुन्हा एकदा भारतातील न्यायाधीशांच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी पुन्हा एकदा भारतातील न्यायाधीशांच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत असल्याचं मोठं वक्तव्य करत त्यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. छत्तीसगडचे माजी प्रधान सचिव अमन सिंग आणि त्यांची पत्नी यास्मिन सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या घोषित उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता मिळाल्याबद्दल सुनावणी सुरू होती.

हे प्रकरण उचित शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे, यामध्ये राज्याचे माजी प्रधान सचिव आणि त्यांच्या पत्नीच्या बेनामी तसंच इतर मालमत्तेची माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअरविरुद्धच एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने स्वतंत्र अपीलही दाखल केलं आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारांच्या प्रवृत्तीवर भाष्य केले. "आजकाल सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत आहेत आणि ही दुर्दैवी परिस्थिती आहे," असं सरन्यायधीश रमणा म्हणाले.

दरम्यान या प्रकरणी सुनावणी आता १८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. सरकार आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीश म्हणाले की, "पूर्वी केवळ खाजगी संस्था किंवा पक्ष न्यायालयात न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असत. पण आता सरकारे हे करू लागले आहेत," ही परिस्थिती अधिक दुर्दैवी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतGovernmentसरकार