शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 17:50 IST

CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले.

CJI DY Chandrachud: जर तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. तंत्रज्ञान शिकावेच लागेल. त्याला आता पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा वापर न्यायाधीशांच्या प्राधान्यांवर अवलंबून नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात व्यक्त करत खडसावले. 

उच्च न्यायालयात 'हायब्रिड' सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हर्चुअल सुनावणी किंवा हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना, CJI चंद्रचूड म्हणाले की, जर तुम्हाला न्यायाधीश बनायचे असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावेच लागेल.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मुंबई उच्च न्यायालय इतके उदासीन का आहे?

मुंबई उच्च न्यायालयात पायाभूत सुविधांचा भंग केला आहे. उच्च न्यायालयात काम केले आहे. मला सांगताना दुःख होत आहे की हायब्रीड पद्धत काढून टाकली गेली आहे. किती स्क्रीन काढल्या आहेत? न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या व्यतिरिक्त किती न्यायालयांमध्ये हायब्रीड सुनावणी आहे?, अशी विचारणा करत, भारतातील प्रत्येक न्यायाधीशाला तंत्रज्ञानाच्या बरोबरीने राहावे लागेल, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायाधीश हे तंत्रस्नेही आहेत की नाही हा प्रश्न नाही. तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला टेक्नो फ्रेंडली व्हायला हवे. तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येक न्यायाधीश प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, तर उच्च न्यायालय या प्रकरणात इतके उदासीन का आहे, असा थेट सवाल चंद्रचूड यांनी केला. 

दरम्यान, तंत्रज्ञान आता निवडीचा विषय नाही आणि ते कायद्याच्या पुस्तकांइतकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाशिवाय न्यायालय कसे चालेल, अशी विचारणाही चंद्रचूड यांनी केली. महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. वीरेंद्र सराफ यांना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, एका वकिलाने सांगितले की मुंबई उच्च न्यायालयात तंत्रज्ञान जवळपास संपुष्टात आणले जात आहे. यावर, सराफ म्हणाले की, विनंती केल्यास न्यायाधीश व्हर्जुअल सुनावणीस परवानगी देतात. या उत्तरावर, इतर न्यायाधीश तंत्रज्ञान का स्वीकारत नाहीत? यात आक्षेप काय आहे? मुंबईसारख्या शहरात प्रवास करणे खूप कठीण आहे. एक वकील म्हणून मला उच्च न्यायालयातून शहर दिवाणी न्यायालयात पोहोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल, असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट