शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

“न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञान शिकावेच लागेल”; CJI चंद्रचूड यांनी मुंबई HCला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 17:50 IST

CJI DY Chandrachud: तंत्रज्ञान आता निवडीचा विषय राहिलेला नाही. कायद्याच्या पुस्तकांइतकेच तंत्रस्नेही असणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाच्या कार्यपद्धतीवर CJI चंद्रचूड यांनी चांगलेच ताशेरे ओढले.

CJI DY Chandrachud: जर तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. तंत्रज्ञान शिकावेच लागेल. त्याला आता पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा वापर न्यायाधीशांच्या प्राधान्यांवर अवलंबून नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात व्यक्त करत खडसावले. 

उच्च न्यायालयात 'हायब्रिड' सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हर्चुअल सुनावणी किंवा हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना, CJI चंद्रचूड म्हणाले की, जर तुम्हाला न्यायाधीश बनायचे असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावेच लागेल.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मुंबई उच्च न्यायालय इतके उदासीन का आहे?

मुंबई उच्च न्यायालयात पायाभूत सुविधांचा भंग केला आहे. उच्च न्यायालयात काम केले आहे. मला सांगताना दुःख होत आहे की हायब्रीड पद्धत काढून टाकली गेली आहे. किती स्क्रीन काढल्या आहेत? न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या व्यतिरिक्त किती न्यायालयांमध्ये हायब्रीड सुनावणी आहे?, अशी विचारणा करत, भारतातील प्रत्येक न्यायाधीशाला तंत्रज्ञानाच्या बरोबरीने राहावे लागेल, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायाधीश हे तंत्रस्नेही आहेत की नाही हा प्रश्न नाही. तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला टेक्नो फ्रेंडली व्हायला हवे. तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येक न्यायाधीश प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, तर उच्च न्यायालय या प्रकरणात इतके उदासीन का आहे, असा थेट सवाल चंद्रचूड यांनी केला. 

दरम्यान, तंत्रज्ञान आता निवडीचा विषय नाही आणि ते कायद्याच्या पुस्तकांइतकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाशिवाय न्यायालय कसे चालेल, अशी विचारणाही चंद्रचूड यांनी केली. महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. वीरेंद्र सराफ यांना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, एका वकिलाने सांगितले की मुंबई उच्च न्यायालयात तंत्रज्ञान जवळपास संपुष्टात आणले जात आहे. यावर, सराफ म्हणाले की, विनंती केल्यास न्यायाधीश व्हर्जुअल सुनावणीस परवानगी देतात. या उत्तरावर, इतर न्यायाधीश तंत्रज्ञान का स्वीकारत नाहीत? यात आक्षेप काय आहे? मुंबईसारख्या शहरात प्रवास करणे खूप कठीण आहे. एक वकील म्हणून मला उच्च न्यायालयातून शहर दिवाणी न्यायालयात पोहोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल, असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट