शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:18 IST

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

VP Jagdeep Dhankhar on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली. ८ एप्रिल रोजी, सर्वोच्च न्यायालयाने पहि राष्ट्रपतींनी राज्यपालांनी पाठवलेल्या प्रलंबित विधेयकांवर तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असा सल्ला निरीक्षण नोंदवून दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त करत म्हटले आहे की भारताने अशा पद्धतीच्या लोकशाहीची कधीही कल्पनाही केली नव्हती.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मान्यता देण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत, असे उपराष्ट्रपती म्हणाले. न्यायालयांना राष्ट्रपतींना निर्देश द्यावे लागतील अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकत नाही, असे जगदीप धनखड म्हणाले. संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत न्यायालयाला देण्यात आलेले विशेष अधिकार हे आता लोकशाही शक्तींविरुद्ध क्षेपणास्त्र बनल्याचेही धडखड यांनी म्हटलं. त्यामुळे आता न्यायालय आणि उपराष्ट्रपतींमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आपला देश कुठे चालला आहे?

"भारताने अशा लोकशाहीची कल्पनाही केली नव्हती जिथे न्यायाधीश कायदे करतील आणि सुपर पार्लमेंट म्हणून काम करतील. नुकत्याच एका निर्णयाद्वारे राष्ट्रपतींना निर्देश देण्यात आले आहेत. पण आपण कुठे चाललोय? आपल्या देशात हे काय चाललं आहे? आपण अत्यंत संवेदनशील असलं पाहिजे. आपण हा दिवस पाहण्यासाठी लोकशाहीची कल्पना केली नव्हती. राष्ट्रपतींना वेळेवर निर्णय घेण्यास सांगितले जाते आणि जर तसे झाले नाही तर ते कायदा बनवले जातात," असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

"आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत जे कायदे करतात, कार्यकारी कामं पण करता, सुपर पार्लमेंट म्हणूनही काम करतात आणि त्यांना कोणतीही जबाबदारी राहत नाही कारण देशाचा कायदा त्यांना लागू होत नाही. माझ्या आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती की मला हे पहावे लागेल," असंही उपराष्ट्रपती म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींना ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. ८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांच्या प्रकरणात हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

विधानसभेने पाठवलेल्या विधेयकावर राज्यपालांना एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांच्या बाबतीत राष्ट्रपतींना पूर्ण नकाराधिकार किंवा पॉकेट विटो अधिकार वापरण्याचा अधिकार नाही. त्यांच्या निर्णयाचा न्यायालयीन आढावा घेतला जाऊ शकतो आणि महाभियोग विधेयकाची घटनात्मकता न्यायपालिका ठरवेल, असेही न्यायालयाने म्हटले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयjagdeep dhankharजगदीप धनखडNarendra Modiनरेंद्र मोदी