शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सद्गुरुंच्या आश्रमात मुलींचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप; कोर्टात सुरू असलेला खटला सुप्रीम कोर्टाने केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:54 IST

Supreme Court On Isha Foundation : सुप्रीम कोर्टाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे ईशा फाऊंडेशन प्रकरण बंद केले आहे.

Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने ईशा फाऊंडेशनवरील सर्व कारवाई बंद केली आहे. एका माजी प्राध्यपकाने याचिकेत त्याच्या दोन मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना जग्गी वासुदेव यांच्या कोईम्बतूर येथील ईशा फाऊंडेशनमध्ये राहण्यास भाग पाडले गेले होते असा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाने ईशा  फाउंडेशनच्या विरोधात उच्च न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द केली आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही महिला प्रौढ असल्याचा निर्णय दिला. "आम्ही दोन्ही महिलांशी बोललो आणि त्यांचे रेकॉर्डिंग केले. त्या दोघांनी सांगितले की ते त्या स्वेच्छेने तेथे राहतात आणि आम्हाला याचिका बंद करण्याची आवश्यकता आहे," असे खंडपीठाच्या अहवालानुसार सरन्यायाधीश म्हणाले. खंडपीठाने हे देखील स्पष्ट केले की त्यांचा आदेश पोलिसांना कोणत्याही तपासापासून रोखणार नाही.

याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, आश्रमात काही कमतरता असल्यास तामिळनाडू सरकार त्याकडे लक्ष देऊ शकते. वडीलही त्यांच्या मुलींना भेटू शकतात. तसेच ते पोलिसांसोबत तेथे जाऊ शकत नाही. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटलं की आम्ही वडिलांशीही बोललो आणि त्यांना सांगितले की ते त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. याचिका दाखल करण्यापेक्षा त्यांचा विश्वास जिंकला पाहिजे, असे खंडपीठाने म्हटलं.

अशा याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश देणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुलींच्या वडिलांची याचिका चुकीची आहे, कारण दोन्ही मुली प्रौढ आहेत आणि ते तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत आहेत, असेही खंडपीठाने म्हटलं. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने या महिलांच्या वडिलांनी दाखल केलेला खटला बंद केला.

दरम्यान, निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचे म्हटलं होतं. तसेच मुलींना ईशा फाऊंडेशनकडून संसारात न रमता संन्यासी जीवन जगण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्तींनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावणारा इतरांच्या मुलींना  इतर तरुणींना संसाराचा त्याग करून संन्याशांसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?, असा सवाल सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या वकिलाला विचारला होता. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या योगा केंद्रामध्ये छापे टाकले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनने सुप्रीम कोर्टातून पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती आणली होती. 

टॅग्स :Jaggi Vasudevजग्गी वासुदेवSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडू