शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सद्गुरुंच्या आश्रमात मुलींचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप; कोर्टात सुरू असलेला खटला सुप्रीम कोर्टाने केला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:54 IST

Supreme Court On Isha Foundation : सुप्रीम कोर्टाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे ईशा फाऊंडेशन प्रकरण बंद केले आहे.

Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने ईशा फाऊंडेशनवरील सर्व कारवाई बंद केली आहे. एका माजी प्राध्यपकाने याचिकेत त्याच्या दोन मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना जग्गी वासुदेव यांच्या कोईम्बतूर येथील ईशा फाऊंडेशनमध्ये राहण्यास भाग पाडले गेले होते असा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाने ईशा  फाउंडेशनच्या विरोधात उच्च न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द केली आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही महिला प्रौढ असल्याचा निर्णय दिला. "आम्ही दोन्ही महिलांशी बोललो आणि त्यांचे रेकॉर्डिंग केले. त्या दोघांनी सांगितले की ते त्या स्वेच्छेने तेथे राहतात आणि आम्हाला याचिका बंद करण्याची आवश्यकता आहे," असे खंडपीठाच्या अहवालानुसार सरन्यायाधीश म्हणाले. खंडपीठाने हे देखील स्पष्ट केले की त्यांचा आदेश पोलिसांना कोणत्याही तपासापासून रोखणार नाही.

याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, आश्रमात काही कमतरता असल्यास तामिळनाडू सरकार त्याकडे लक्ष देऊ शकते. वडीलही त्यांच्या मुलींना भेटू शकतात. तसेच ते पोलिसांसोबत तेथे जाऊ शकत नाही. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटलं की आम्ही वडिलांशीही बोललो आणि त्यांना सांगितले की ते त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. याचिका दाखल करण्यापेक्षा त्यांचा विश्वास जिंकला पाहिजे, असे खंडपीठाने म्हटलं.

अशा याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश देणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुलींच्या वडिलांची याचिका चुकीची आहे, कारण दोन्ही मुली प्रौढ आहेत आणि ते तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत आहेत, असेही खंडपीठाने म्हटलं. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने या महिलांच्या वडिलांनी दाखल केलेला खटला बंद केला.

दरम्यान, निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचे म्हटलं होतं. तसेच मुलींना ईशा फाऊंडेशनकडून संसारात न रमता संन्यासी जीवन जगण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्तींनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावणारा इतरांच्या मुलींना  इतर तरुणींना संसाराचा त्याग करून संन्याशांसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?, असा सवाल सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या वकिलाला विचारला होता. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या योगा केंद्रामध्ये छापे टाकले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनने सुप्रीम कोर्टातून पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती आणली होती. 

टॅग्स :Jaggi Vasudevजग्गी वासुदेवSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडू