शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:57 IST

गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिलेली -  गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले अपुरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारला सांगितले आहे. मेघालयमधील कोळशाच्या खाणींमध्ये हे 15 मजूर गेल्या 13 डिसेंबरपासून अडकून पडले आहेत.  खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अद्याप यश का आलेले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीक यांच्या खंडपीठाने मेघालय सरकारकडे केली आहे. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात असून, केंद्र सरकारकडूनही मदत मिळत आहे, असे न्यायालयाला सांगितले. मात्र सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आम्ही संतुष्ट नाही. इथे खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. असे न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या वकिलांना सुनावले. तसेच या प्रकरणी योग्य ते आदेश देता यावेत यासाठी केंद्राच्या अॅटर्नी जनरलनाही न्यायालयात बोलावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले. 

मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी करणारी याचिका आदित्य एन. प्रसाद यांनी दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर न्यायालयात आजही सुनावणी सुरू राहणार आहे. मेघालयच्या पूर्वेला असलेल्या जैतीया पर्वतामध्ये असलेल्या एका खाणीत लितेन नदीचे पाणी भरल्याने खाणीत काम करणारे 15 मजूर आत अडकले होते.  

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत