शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Aadhar Verdict: 'या' दोन मराठी न्यायाधीशांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला 'आधार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 13:20 IST

Aadhar Verdict Update: आधार वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला

नवी दिल्ली: आधार कार्ड वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात चार न्यायमूर्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे यातील दोन न्यायाधीश हे मराठी आहेत. दीपक मिश्रा:आधार कार्ड वैध असल्याचा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचं अध्यक्षपद दीपक मिश्रांकडे होतं. 27 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर निवृत्त झाले. यानंतर मिश्रा यांनी सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळली. ते देशाचे 45 वे सरन्यायाधीश आहेत. मिश्रा 2 ऑक्टोबर 2018 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिले. यामध्ये समलैंगिकता आणि आधार कार्डच्या वैधतेचा समावेश आहे. याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये आणखी महत्त्वपूर्ण निकाल दिले जाणार आहेत. ए. एम. खानविलकर: अजय माणिकराव खानविलकर यांनी याआधी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. 29 मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. 13 मे 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. डी. वाय. चंद्रचूड: धनंजय यशवंत चंद्रचूड यांची 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. परदेशात शिक्षण घेतलेल्या चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्यांची कारकीर्द सुरू केली. यानंतर त्यांची देशाच्या अतिरिक्त महाधिवक्तेपदी नेमणूक झाली. त्यांनी अलाहाबादचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलं. यानंतर 2016 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. याशिवाय या घटनापीठात न्यायमूर्ती अशोक भूषण आणि अर्जन कुमार सिकरी यांचाही समावेश होता. त्यांनीही या निकालात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय