सारांश---पावसामुळे तारांबळ
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30
अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

सारांश---पावसामुळे तारांबळ
अ ोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.***************************************************************************धुरळणी यंत्र उपलब्ध कराअकोला: शहरात ठिकठिकाणी साचलेले कचरा व घाणीचे ढीग यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे विविध आजारांची साथ पसरली असून, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने त्वरित धुरळणी यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.***************************************************************************कुत्र्यांची नसबंदी कराअकोला: मुख्य बाजारपेठसह रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून, नागरिक वैतागले आहेत. रात्री घरी परतणार्या वाहनधारकांना कुत्र्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मनपाने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचे पत्र सिंधी कॅम्पस्थित नागरिकांनी दिले.***************************************************************************पथदिवे बंदचअकोला: महापालिका प्रशासनाने झोननिहाय पथदिवे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले. नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असली तरी गोडबोले उद्यानसमोरील पथदिवे मागील आठ दिवसांपासून नादुरुस्त आहेत.