शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पाहुण्या चित्त्यांना बोचणार नाहीत काटे; महाराष्ट्राच्या ग्रासमॅनची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 05:57 IST

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता.

 नरेंद्र जावरेमेळघाट (जि. अमरावती) : मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ प्रा. गजानन मुरतकर यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलातील उजाड प्रदेशात २०१३ ते २०१९ अशी सलग सात वर्षे परिश्रम घेऊन व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नामिबियामधून आलेल्या चित्त्यांसाठी योग्य कुरणक्षेत्र तयार केले आहे. याच मऊ गवतावर आता चित्त्यांची पावले पडणार आहेत. 

२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आवश्यक कुरणक्षेत्र तयार करण्याचे काम सुरू झाले होते. तेव्हा शुष्क पानझडीचे हे जंगल होते. परंतु, सिंह सोडण्याची योजना रद्द झाली. मात्र, कुरणक्षेत्र तयार झाल्यानंतर चित्त्यांसाठी योग्य वातावरणनिर्मिती तपासण्यात आली. देशातील १४पेक्षा अधिक राज्यांमध्ये गवती कुरण तयार करण्याचा अनुभव असलेले मेळघाटातील ग्रासमॅन प्रा. गजानन मुरतकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. 

तिन्ही ऋतूंमध्ये कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्कृष्ट आहे. डेहराडून व इतर सर्व संस्थांनीसुद्धा तसा अहवाल दिला. कुरणक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात विकसित झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या व नदी असल्याने पाहुणा चांगला स्थिरावणार, यात दुमत नाही.  - प्रा. गजानन मुरतकर, ग्रासमॅन, मेळघाट

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलाशी कुनो पालपूर अभयारण्याचा परिसर मिळताजुळता असल्याचे आढळून आले आहे. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी असलेले कुनो हे देशातील पहिले अभयारण्य आहे. बोरीची काटेरी झाडे विपुल होती. कुरणक्षेत्र तयार करण्यात ते मोठे आव्हान होते. बोरीचे काटे चित्त्याच्या पायात रुतून जखमा होऊ नयेत म्हणून बोरीची झाडे पूर्णतः काढली गेली.