आत्महत्येपासून आत्मनिर्भर बनू शकतो, तरुणांमध्ये वाढतेय आत्महत्येचं प्रमाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 09:07 PM2020-09-10T21:07:13+5:302020-09-10T21:07:50+5:30

आत्महत्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.

From suicide to self-reliance, the rising suicide rate among young people | आत्महत्येपासून आत्मनिर्भर बनू शकतो, तरुणांमध्ये वाढतेय आत्महत्येचं प्रमाण 

आत्महत्येपासून आत्मनिर्भर बनू शकतो, तरुणांमध्ये वाढतेय आत्महत्येचं प्रमाण 

Next
ठळक मुद्देमानसिकता बदलून आत्महत्यांना प्रतिबंध घातला येऊ शकतो. याबाबत डॉक्टरांशी बोलून सविस्तर माहिती घेतली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येवरून बराच कलह निर्मह झाला आहे. मात्र, या घटनेनंतर तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचे अधोरेखित केले आहे. आत्महत्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. जागतिक आरोग्य संघटनेने 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून जाहीर केला असून कोरोना संकटकाळात या दिनाला फार महत्व आले आहे. संसार गाढा नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले, नोकरी गेली आणि आर्थिक संकट, प्रेमप्रकरणं, नैराश्य अशा अनेक कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही वेगळी कारणे समोर येत आहेत. मानसिकता बदलून आत्महत्यांना प्रतिबंध घातला येऊ शकतो. याबाबत डॉक्टरांशी बोलून सविस्तर माहिती घेतली आहे.

आत्महत्या का होतात आणि त्या कशाप्रकारे रोखता येऊ शकतील याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निशिकांत विभुते यांनी सांगितले,'कोणीतरी आत्महत्या केली' ही बातमी ऐकताच सगळे लोक त्याला "पळपुट्या , बिचारा, भ्याड ..." असे म्हणून त्याला हिनवतात किंवा त्याची कीव करू लागतात. पण त्या व्यक्तीला नेमके काय वाटत असावे, त्याला आत्महत्या करण्यासाठी कोणती गोष्ट प्रवृत्त करत असावी ह्याबद्दल विचार करण्याच्या भानगडीत आपण सहसा पडत नाही. पण समजा तीच आत्महत्या एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीने केली असेल तर मात्र मनामध्ये नक्कीच कुतूहल निर्माण होते. आता या ठिकाणी आत्महत्या म्हणजे नेमके काय, त्याची मानसिकता काय असते, आणि अशा आत्महत्या होऊ नये म्हणून नेमके काय करता येईल ते आपण पाहूया.

आत्महत्या म्हणजे एका निराश व्यक्तीने आपल्या अडचणीचा एक निवडलेला चुकीचा उपाय असतो. त्या व्यक्तीला एका परिस्थितीला सामोरे जावे लागत असते आणि त्या परिस्थितीमधून बाहेर कसे निघायचे हे त्याला मात्र समजत नाही. त्या व्यक्तीला वाटते की, काहीजरी केले, तरी आपण ह्या काही या जटिल अडचणीमधून निघू शकत नाही. "जर आपण हा जीवच त्यागला तर मात्र आपण एकदाचे ह्या सगळ्यातून मुक्त होऊ " हा एक टोकाचा विचार असतो. यालाच आपण टोकाची निराशा असेही म्हणू शकतो.


निराशा उदासीनता आणि डिप्रेशन म्हणजे काय ?

ह्या उदासीनते मागे विविध कारणं असू शकतात. कधी ते एखाद्या छोट्याशा कालावधीत निर्माण झालेल्या अडचणी स्वरूपात असू शकतात तर कधी त्या व्यक्तीला आधीपासून असलेल्या डिप्रेशन अर्थात उदासीनतेच्या आजाराच्या रूपाने ही असू शकतात. डिप्रेशन किंवा उदासीनता कशामुळे निर्माण होते ? डिप्रेशनला आपण दोन प्रकारांमध्ये विभागू शकतो.

पहिला प्रकार : परिस्थितीनुसार निर्माण होणारे डिप्रेशन ((Reactive Depression)

बिकट परिस्थिती आणि त्याला लढण्यासाठी व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये कमी पडणारे उपाय अर्थात त्या व्यक्तीला परिस्थितीतून बाहेर कसे निघायचे हेच कळत नाही. त्यामुळे तणावावर तणाव वाढत जातो आणि त्यामुळे डिप्रेशन अर्थात उदासीनता निर्माण होते. कोविड पॅनडेमिकमुळे निर्माण झालेली जागतिक निराशा हा याच प्रकारात मोडते.

 दुसरा प्रकार : यातून निर्माण होणाऱ्या निराशेचा आजार (Endogenous Depression)

ह्या ठिकाणी बाहेरची परिस्थिती कशीही असली तरीही त्या माणसाला निराश आणि उदास वाटण्यास सुरुवात होते . ज्या पद्धतीने डायबिटीज आणि उच्चरक्तदाब हे आजार आहेत त्याचप्रमाणे हा निराशेचा प्रकार एक आजार आहे. ह्या प्रकारामध्ये माणसाच्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये काही रसायन आपोआप निर्माण होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला विनाकारण नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक वागणूक निर्माण होतात. अनुवांशिक किंवा मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या कार्य करण्याच्या पध्दतीमध्ये होणारे बदल ह्या आजाराला कारणीभूत असतात .


ह्या डिप्रेशनचे निराशावादी (Hopelessness), निराधार (helplessness) आणि कमी दर्जा असणं (worthlessness) असं वाटणं ही प्रमुख कारणे आहेत . माणसाला भविष्यात काहीतरी चांगले होईल याबद्दलची आशा कमी वाटू लागते. आपण एकदम एकटे आणि दुर्बल, दुबळे पडलेलो आहोत जिथुन दुसरा कोणीही व्यक्ती किंवा परिस्थिती मला बाहेर काढू शकत नाही अशी भावना निर्माण होते. आपल्या जगण्याची मुळी काही किंमतच नाही. आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या उपयोगी पडत नाहीये. अशा प्रकारच्या भावना त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागतात.

ह्या विचाराने तरी त्या व्यक्तीला झोप कमी येणे किंवा जास्त येणे, सतत थकवा किंवा कमजोरीची भावना, उत्साहाची कमतरता आणि आधी ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळत होता.  त्या गोष्टींमधून आनंद न मिळणे हे ह्या डिप्रेशनचे सर्वसाधारणपणे दिसणारे लक्षणे आहेत.


कोरोनामध्ये डिप्रेशनची वाढ आणि सोबतच आत्महत्यांमध्ये होणारी वाढ का होत आहे ?

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे लॉकडाऊन समाजामध्ये वाढणाऱ्या तणावासाठी आणि डिप्रेशनसाठी इतर अनेक कारणांमधील एक आहे.

विचारांना बंदिस्तपणा : आधी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटून प्रत्येकजण आपले मन हलके करत असे. पण ह्या लॉकडाऊनमुळे लोक इतर एकमेकांना भेटू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्यामधला संवाद बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. मनामध्ये असणारा तणाव ते मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा दबाव अधिक अधिक वाढत जातो.


घरगुती कलह : संपूर्ण वेळ घरातील मंडळी घरातच असल्यामुळे एकमेकांचे वागणे थोडे जरी खटकले तरी त्याचे रूपांतर वादावादी आणि नंतर कलह किंवा निराशेमध्ये होते. विविध कारणांमुळे मनात असलेला तणाव त्या व्यक्तीला चिडचिडा बनवतो आणि असा चिडचिड करणाऱ्या व्यक्तीसमोर त्याला न आवडणारी घटना घडली की तो काहीतरी रागाने बोलतो आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरा व्यक्ती बोलतो. आणि ह्यातूनच वादांचे दुष्टचक्र चालू होते. पती-पत्नी यांनी एकमेकांची बाजू समजून न घेतल्यामुळे आणि आपलीच बाजू महत्त्वाची अशी धारणा ठेवल्यामुळे जास्तीत जास्त वाद आपल्याला या पंडेमिकमध्ये दिसत आहेत.


आर्थिक तणाव : महामारीच्या कारणामुळे बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावलेल्या आहेत. ज्यांच्या नोकऱ्या टिकलेल्या आहेत, त्यांना देखील बऱ्याच प्रमाणामध्ये वेतानामध्ये कपात सहन करावी लागत आहे. एकीकडे वाढत जाणारा नेहमीचा खर्च आणि दुसरीकडे वेतनाचा अभाव किंवा वेतनाची कपात हा तणाव त्या व्यक्तीला अधिकाधिक नैराश्यामध्ये ढकलत जातो.


कामाचा तणाव : जरी वेतन कमी असलं तरी काम मात्र आहे तेवढेच किंवा आधीच्या पेक्षा जास्त करावे लागते ही सध्याची परिस्थिती आहे. जिथे महामारी म्हणून लोकांच्या नोकऱ्या सोबत आहेत. तिथे आपण आपल्या उच्च अधिकाऱ्यांना तक्रार किंवा विरोध करतातच आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील ही टांगती तलवार प्रत्येकावर लटकत असते. हा विरोधाभास त्या माणसाला सतत तणावामध्ये टाकत असतो.


शारीरिक तणाव : घरातून बाहेर निघणे, व्यायाम अथवा इतर शारीरिक परिश्रमाचा अभाव, सूर्यप्रकाशाचा अभाव, सकस आहाराचा अभाव ह्यामुळे प्रत्येक माणसाच्या शरीरावर ती तणाव पडत आहे. हा तणाव आपोआपच मानसिक तणावाला सुद्धा कारणीभूत ठरतो.

निराशा किंवा आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर कसे निघायचे ?


मानसिक उपाय : ज्या व्यक्तीच्या मनामध्ये निराशेची भावना निर्माण झालेली आहे आणि आत्महत्येचे विचार येत आहेत त्या व्यक्तीने तातडीने आपल्या जवळच्या घरातील परीजणांना किंवा आप्त व्यक्तींना मन मोकळेपणाने सांगणे खूप आवश्यक आहे. "दुसरा काय म्हणेल ? आपल्या विचारांना हसेल , आपली अवहेलना करेल " असा विचार न करता मोकळेपणाने सांगितल्यामुळे व्यक्ती आपल्याला काहीतरी मदत करू शकेल किंवा सांगितल्यामुळे आपले मन मोकळे होईल हे समजून घेऊन तातडीने आपले विचार आप्त व्यक्तीला सांगावेत.


सध्याची परिस्थिती अवघड असली तरीही ही परिस्थिती कायम राहणार नाही . पुढे चालून ही परिस्थिती बदलणार आहे. जी कोणती परिस्थिती समोर येत जाईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहीन. त्यामुळे अवघड परिस्थितीमध्ये माझ्यावर येणार आहात नाव सहन करण्यास मी तयार आहे. मी ह्या पासून पाठ फिरवणार नाही . अशा पद्धतीची मानसिकता त्या व्यक्तीने बनवणे खूप आवश्यक आहे. आत्महत्या हा काही ह्या अडचणीतून बाहेर निघण्याचा उपाय नाही, उलट मी आत्महत्या केल्यास त्यामुळे अडचणी अधीकच वाढतील हे विचार मनामध्ये प्रखर करावेत.


घरातील इतरांनी अशा परिस्थितीत त्या व्यक्ती सोबत कसे वागावे ?

जर एखादा व्यक्ती मला आत्महत्या करायचे विचार येत आहेत असे बोलून दाखवत असेल तर त्याला आपण जराही दुर्लक्ष करू नये. त्या व्यक्तीच्या विचाराला आपण हलकेपणाने घेऊ नये.

वैद्यकीय उपचार :

मानसोपचार तज्ञ निराशा किंवा डिप्रेशन हा आजार ओळखून त्यासाठी उपलब्ध असणारी औषधे चालू करतात. ही औषधे मनामध्ये निराशा आणि तणावाची रसायने वाढलेली असतात त्यांना हळूहळू कमी करत नेतात. आणि त्यासोबत त्या व्यक्तीची निराशा कमी होऊ लागते. सोबत तर त्या व्यक्तीला काउन्सेलिंग अर्थात समुपदेशन केले जाते.


काउन्सिलिंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्या व्यक्तीची कमी पडणारी मानसिक ताकद त्याने कशी वाढवावी हे समजाविले जाते. त्या व्यक्तीमध्ये विविध अडचणींना सामोरे जाण्यासाठी कोणते मानसिक समर्थ त्या व्यक्तीने स्वतः कसे निर्माण करावयाचे शिकविले जाते .

अडचणींमधून बाहेर निघण्यासाठी त्या व्यक्तीचे मनोबल वाढविले जाते. अशा पद्धतीने वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन मिळाल्यानंतर हळूहळू तो व्यक्ती पूर्णपणे ठीक होऊन आपल्या आयुष्यामध्ये आपले जीवन इतर व्यक्तीने प्रमाणे किंबहुना अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला निराशेचा आजार , कोरोना महामार्गामुळे वाढत जाणारा तणाव, आत्महत्या आणि आत्महत्याची मानसिकता आणि त्याच सोबत त्यातून बाहेर निघण्याचे उपाय आपण आज समजून घेतलेले आहेत . ह्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी नक्कीच करू शकतो. अशा पद्धतीने आपण समजदार होऊन कोविद महामारी पेक्षा भयंकर असणाऱ्या "आत्महत्या आणि निराशा" ह्या महाभयंकर आजारांवर नक्कीच मात करू शकतो.

आत्महत्या, स्वतःचे जीवन घेणे ही तणावग्रस्त जीवनातील घटनेची शोकांतिका प्रतिक्रिया असल्याचं डॉक्टर कमलेश सूर्यवंशी म्हणतात. सूर्यवंशी यांनी सांगितले की, आत्महत्या रोखली जाऊ शकते. आयुष्यातील वेदना संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्महत्या. परंतु आपण सुरक्षित राहण्यासाठी पावले उचलू शकता आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा आनंद घेण्यास प्रारंभ देखील करू शकता.



आत्महत्येबद्दल इशारा देणारी लक्षणं

आत्महत्येबद्दल बोलणे - उदाहरणार्थ, "मी स्वतःला ठार मारणार आहे," "" मी मरायला हवे होते "किंवा" माझी इच्छा आहे की माझा जन्म झाला नसता "अशी विधाने करणे.

बंदूक खरेदी करणे किंवा गोळ्या साठवण्यासारख्या स्वत: चा जीव घेण्याचे साधन मिळवणे

सामाजिक संपर्कातून माघार घेणे आणि एकटे राहू इच्छित

एक दिवस भावनिक उंचावर जाणे आणि दुसऱ्या दिवशी मनापासून निराश होणे यासारख्या मूड स्विंग्समुळे

मृत्यू, मरणार किंवा हिंसाचारात व्यस्त रहाणे

एखाद्या परिस्थितीबद्दल अडकलेले किंवा हताश झाल्यासारखे वाटते

अल्कोहोल किंवा ड्रग्जचा वाढता वापर

खाणे किंवा झोपेच्या पद्धतींसह सामान्य दिनचर्या बदलणे

धोकादायक किंवा स्वत: ची विध्वंसक गोष्टी करणे, जसे की औषधे वापरणे किंवा बेपर्वाईने वाहन चालविणे

जेव्हा असे करण्याचे कोणतेही अन्य तर्कसंगत स्पष्टीकरण नसते तेव्हा वस्तू सोडणे किंवा व्यवस्थित व्यवहार करणे

लोकांना निरोप देऊन जणू ते पुन्हा दिसणार नाहीत

व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणणे किंवा गंभीरपणे चिंताग्रस्त किंवा विचलित होणे, विशेषत: वरील काही चेतावणी चिन्हे अनुभवताना

चेतावणी देणारी चिन्हे नेहमीच स्पष्ट नसतात आणि ती व्यक्तीनुसार बदलू शकतात. काही लोक आपला हेतू स्पष्ट करतात, तर काही आत्महत्या करणारे विचार आणि भावना गुप्त ठेवतात.

डॉक्टरांना कधी भेटावे:- जर आपणास आत्महत्या झाल्याचे वाटत असेल, परंतु आपण त्वरित स्वत: ला इजा करण्याचा विचार करीत नाही:

एखाद्या जवळच्या मित्राकडे किंवा प्रिय व्यक्तीकडे जा - आपल्या भावनांबद्दल बोलणे जरी कठीण असले तरी आपल्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधा

एक आत्महत्या हॉटलाइनवर कॉल करा

आपल्या डॉक्टर, इतर आरोग्य सेवा प्रदाता किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी भेट घ्या

आत्मघातकी विचारसरणी स्वत: वर चांगली होत नाही - म्हणून मदत मिळवा.


कारणे

आत्महत्या करण्याच्या विचारांना बरीच कारणे आहेत. बहुतेकदा, जीवनातील जबरदस्त परिस्थिती असल्याचा सामना करत असताना आपण सामना करू शकत नाही अशा आत्महत्येचा विचार होतो. आपल्याकडे भविष्याबद्दल आशा नसल्यास, आपण चुकून आत्महत्या करणे हा एक उपाय असल्याचे वाटेल. आपण बोगद्याच्या दृष्टीने एक प्रकारचा अनुभव घेऊ शकता, जेथे आपणास विश्वास आहे की एखाद्या संकटाच्या दरम्यान आत्महत्या हा एकमेव मार्ग आहे.



आत्महत्येचा धोका या व्यक्तींना असू शकतो - यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला

एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, ब्रेकअप किंवा आर्थिक किंवा कायदेशीर समस्या यासारख्या धक्काधक्कीचा जीवनाचा अनुभव घ्या

मादक द्रव्यांचा गैरवापर करण्याची समस्या आहे

शारीरिक किंवा लैंगिक अत्याचारासह मानसिक विकार, पदार्थांचा गैरवापर, आत्महत्या किंवा हिंसा यांचा कौटुंबिक इतिहास आहे

एखादी वैद्यकीय स्थिती आहे ज्यास उदासीनता आणि आत्महत्या विचारांशी जोडले जाऊ शकते, जसे की जुनाट आजार, तीव्र वेदना किंवा टर्मिनल आजार

असमर्थित कुटुंबासह किंवा वैमनस्यपूर्ण वातावरणात समलिंगी, समलिंगी, उभयलिंगी किंवा ट्रान्सजेंडर आहेत


नैराश्यासह मानसिक विकार

जवळचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसह नुकसान किंवा संघर्ष

शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराचा इतिहास

अल्कोहोल किंवा ड्रग्जची समस्या

शारीरिक किंवा वैद्यकीय समस्या, उदाहरणार्थ, गर्भवती होणे किंवा लैंगिक संबंधातून संसर्ग होणे

गुंडगिरीचा बळी

लैंगिक आवडीबद्दल अनिश्चित असणे


स्वत: ला आत्महत्या करण्यापासून वाचविण्यात मदत करण्यासाठी काय करू शकते हे सांगतां डॉक्टर सूर्यवंशी म्हणाले, आपल्याला आवश्यक उपचार मिळवा. जर आपण मूळ कारणांवर उपचार केले नाही तर आपले आत्महत्या करणारे विचार परत येण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्याच्या समस्येवर उपचार घेण्यास आपल्याला लाज वाटेल, परंतु औदासीन्य, पदार्थाचा गैरवापर किंवा इतर मूलभूत समस्यांसाठी योग्य उपचार घेतल्यास आयुष्याबद्दल चांगले वाटते - आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.

आपले समर्थन नेटवर्क स्थापित करा. आत्महत्या करण्याविषयी बोलणे कठीण आहे आणि आपल्या मित्रांना आणि कुटूंबियांना आपण असे का जाणवत आहात हे पूर्णपणे समजू शकत नाही. तरीही पोहोचा आणि आपली काळजी घेत असलेल्या लोकांना काय चालले आहे हे माहित आहे आणि जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेथे आहेत याची खात्री करा. आपणास आपल्या प्रार्थनास्थळ, समर्थन गट किंवा इतर समुदाय संसाधनांकडून देखील मदत मिळू शकेल. कनेक्ट केलेले आणि समर्थित वाटत आत्महत्या होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. लक्षात ठेवा आत्महत्या भावना तात्पुरत्या असतात. जर आपणास हताश वाटत असेल किंवा आयुष्य जगण्यासारखे नसेल तर लक्षात ठेवा की उपचार केल्याने आपला दृष्टीकोन पुन्हा मिळू शकेल - आणि आयुष्य चांगले होईल. एका वेळी एक पाऊल उचला आणि आवेगात वागायला नको.

हे आहेत होमिओपॅथी उपचार

आपण आत्महत्येची कारणे व लक्षणे जाणून घेतलेली आहे यावरून आपल्याला एक लक्षात येईल की ज्या वेळी कुठल्याही कारणाने मनावर दडपण येतं किंवा त्या मनाला वेदना होतात. त्यावेळी माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आणि या परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात पण अशा स्थितीमध्ये जर रुग्णाने होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेतला व त्यांची औषधे सुरू केली तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा त्यांना अनुभवयास मिळतो. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मग ते शालेय स्पर्धात्मक युग असे किंवा महाविद्यालय आपण अनेकदा पाहतो की मुलांमध्ये मार्क मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली असते. उदाहरणार्थ घेऊया ही एक विद्यार्थी आहे तो आता बारावी सायन्सला आहे आणि त्याला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचा आहे एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी किमान पात्रता 95 टक्के आहे तर ते मिळवण्यासाठी तो खूप प्रयत्नशील असतो परीक्षा देतो आणि आणि त्याचा निकाल अनपेक्षित लागतो त्याला तेवढे मागचा मिळत नाही तो मनाने खचतो आणि त्या डिप्रेशनमध्ये तो कदाचित आत्महत्येचा विचार करू शकतो आणि म्हणून आजकालच्या परिस्थितीमध्ये आजकाल आपण पाहतो हे आत्महत्येचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे. या लोकांच्या काळामध्ये तर अनेक लोकांना मानसिक तणाव आलेला आहे आणि आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे आत्महत्येचे विचार घोंगावत आहेत. याची कारणं अनेक असू शकतात पण प्रामुख्याने याचं एक कारण आहे ते म्हणजे आर्थिक चणचण या टाळेबंदी च्या काळात प्रत्येकाला मग तो व्यावसायिक असो किंवा नोकरी करणारा असे प्रत्येकाला आर्थिक उणीव भासत आहे आणि विशेषता ज्यांनी कर्ज काढून घर घेतला आहे की आपल्या कंपनीसाठी कर्ज घेतलेले आहे त्या कुठल्या बाबतीत कर्ज घेतलेले आहे तर त्यांना हे डिप्रेशन तर खूप खूप अतिप्रमाणात आलेला आहे ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांमध्ये ही हे डिप्रेशन आपल्याला बघायला मिळत लोकांच्या हाताला काम नाहीये जर कंपनी चालु आहे तर ऑर्डर मिळत नाहीयेत ऑर्डर मिळाली तर समोरून पेमेंट मिळत नाही अशा आर्थिक दुष्टचक्र मध्ये हेचा कसं रुतलेला आहे यातून बाहेर कसं पडायचं हे या व्यक्तींना कळत नाहीये आणि आणि त्यामुळे आलेल्या मानसिक तणावामुळे त्या लोकांना आत्महत्येचे विचार यायला लागले आहे अशावेळी जर यांनी होमिओपॅथीचा सहारा घेतला नक्कीच ते त्यांच्या मनाला स्थिर करू शकतील आणि या परिस्थितीत ते स्वतःला सावरून या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकतील.

Web Title: From suicide to self-reliance, the rising suicide rate among young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.