शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निमलष्करी दलांमध्ये आत्महत्या अधिक; अस्थैर्य, एकाकीपणाने जवानांमध्ये नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:15 AM

केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या अंदाज समितीने त्यांच्या ताज्या अहवालात मंत्रालयाच्या अधिकाºयांनी यासंदर्भात दिलेली माहिती नमूद केली आहे. जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाºयांनी समितीस सांगितले.आत्महत्या आणि सेवा बजावताना आलेला मृत्यू यांचे सर्वाधिक व्यस्त गुणोत्तर सशस्त्र सेवा दल (१:८), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (१:६३) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (१: ४) या निमलष्करी दलांमध्ये आहे, असेही समितीस सांगण्यात आले.समितीच्या अहवालानुसार गृह सचिवांनी असे सांगितले की, या विषयी आम्ही मंत्रालयात चर्चा केली. त्यातून असे दिसले की, जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. या दलांमधील जवान वर्षातील १०-११ महिने घराबाहेर असतात. त्यावरून वैवाहिक संबंधांना संशयाचे ग्रहण लागते व त्यातून साहजिकच मानसिक तणाव निर्माण होतो. या दलांना नेहमीच कुठे ना कुठे तैनात करावे लागत असल्याने कर्मचाºयांना त्यांच्या हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.मंत्रालायाने असेही सांगितले की, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व भारत तिबेट सीमा पोलीस या दलांनी त्यांच्या नावाप्रमाणे ठराविक ठिकाणीच काम करणे अपेक्षित असले तरी निर्माण होणाºया परिस्थितीनुसार त्यांना आसाम ते केरळ आणि केरळ ते काश्मिर असे देशात कुठेही तैनात केले जाते. परिणामी या दलांमधील जवानांचा एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम नसतो. त्यांचे मुख्यालयही एका ठिकाणी नसते.अशा झाल्या आत्महत्यागृह मंत्रालयाने या सहा वर्षाच्या काळात प्रत्येक दलामध्ये किती आत्महत्या झाल्या याची संगतवार माहिती मंत्रालयाने समितीस दिली नाही. मात्र काही दलांची काही वर्षांची आकडेवारी दिली.ती अशी-- सीआरपीएफ: (सन २०१२) १८९ आत्महत्या, १७५ सेवेत मृत्यू- बीएसएफ: (सन २०११) ५२९ आत्महत्या, ४९१ सेवेत मृत्यू- आयटीबीपी: (सन २००६) ६२ आत्महत्या, १६ सेवेत मृत्यू- सीआयएसएफ: (सन २०१३) ६३ आत्महत्या, एक सेवेत मृत्यू- एसएसबी: (सन २०१३) ३२ आत्महत्या, चार सेवेत मृत्यू- आसाम रायफल्स : (सन २०१४) २७ आत्महत्या, ३३ सेवेत मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्या