शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ऊस थकबाकीच्या बदल्यात देणार साखर; सरकारच्या अजब फंड्याने शेतकऱ्यांत असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:21 IST

सरकारी आणि खासगी मालकीच्या ११७ साखर कारखान्यांनी तेथे आतापर्यंत ११६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे

चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : उत्तर प्रदेशात ऊसबिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांना जूनपर्यंत महिन्याला १०० किलो साखर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावरून तेथील ऊस उत्पादकांत प्रचंड असंतोष आहे. देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तेथे साखर उद्योगाची उलाढाल सुमारे ४० हजार कोटी रुपयांची आहे. सुमारे ५० लाख शेतकरी कुुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. यंदा राज्यात २६ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती.

सरकारी आणि खासगी मालकीच्या ११७ साखर कारखान्यांनी तेथे आतापर्यंत ११६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे मात्र अडचणीतील साखर उद्योग आणि त्यात कोरोना संकटाची पडलेली भर यामुळे तेथील उस बिलांची थकबाकी १२ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. फेब्रुवारीमध्ये ती सात हजार कोटी रुपये होती. देशभरातील थकबाकीचा हा आकडा १८ हजार कोटी रुपये आहे.खरिपाचा हंगाम तोंडावर आहे. तसेच लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांचेही अर्थचक्र थांबले आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने ऊस बिलापोटी शेतकºयांना दरमहा एक क्विंटल साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही साखर शेतकऱ्यांनी कारखान्यातून स्वत: आणावयाची आहे. तसेच त्यावरील जीएसटीही स्वत: भरावयाचा आहे. सरकारच्या या अजब निर्णयाने तेथील ऊस उत्पादकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे; कारण महिन्याला एका कुटुंबाला १० ते १५ किलो साखर लागते. यामुळे या निर्णयाला ऊस उत्पादकांनी विरोध केला आहे.महाराष्ट्रातही फसला होता प्रयोगमहाराष्ट्रातही २०१८-१९ च्या हंगामात एफआरपीच्या थकबाकीपोटी ऊस उत्पादकांना साखर देण्याचे धोरण काही कारखान्यांनी जाहीर केले होते; मात्र त्यासाठी एकही शेतकरी पुढे न आल्याने हे धोरण फसले होते. उत्तर प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे दिसते.उत्तर प्रदेश सरकारने ऊस बिलांची थकबाकी देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतील पैसे दिले होते; यंदा साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, साखर कारखाना महासंघलॉकडाउनच्या काळात एकतर साखरेला उठाव नाही आणि कारखान्याकडून घेतलेली साखर शेतकरी विकणार कोठे, असा प्रश्न आहे. त्यामुळे योगी सरकारने घेतलेला हा निर्णय अयोग्य आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखाने