शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

ऊस थकबाकीच्या बदल्यात देणार साखर; सरकारच्या अजब फंड्याने शेतकऱ्यांत असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:21 IST

सरकारी आणि खासगी मालकीच्या ११७ साखर कारखान्यांनी तेथे आतापर्यंत ११६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे

चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : उत्तर प्रदेशात ऊसबिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्यांना जूनपर्यंत महिन्याला १०० किलो साखर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावरून तेथील ऊस उत्पादकांत प्रचंड असंतोष आहे. देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तेथे साखर उद्योगाची उलाढाल सुमारे ४० हजार कोटी रुपयांची आहे. सुमारे ५० लाख शेतकरी कुुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. यंदा राज्यात २६ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती.

सरकारी आणि खासगी मालकीच्या ११७ साखर कारखान्यांनी तेथे आतापर्यंत ११६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे मात्र अडचणीतील साखर उद्योग आणि त्यात कोरोना संकटाची पडलेली भर यामुळे तेथील उस बिलांची थकबाकी १२ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. फेब्रुवारीमध्ये ती सात हजार कोटी रुपये होती. देशभरातील थकबाकीचा हा आकडा १८ हजार कोटी रुपये आहे.खरिपाचा हंगाम तोंडावर आहे. तसेच लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांचेही अर्थचक्र थांबले आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने ऊस बिलापोटी शेतकºयांना दरमहा एक क्विंटल साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही साखर शेतकऱ्यांनी कारखान्यातून स्वत: आणावयाची आहे. तसेच त्यावरील जीएसटीही स्वत: भरावयाचा आहे. सरकारच्या या अजब निर्णयाने तेथील ऊस उत्पादकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे; कारण महिन्याला एका कुटुंबाला १० ते १५ किलो साखर लागते. यामुळे या निर्णयाला ऊस उत्पादकांनी विरोध केला आहे.महाराष्ट्रातही फसला होता प्रयोगमहाराष्ट्रातही २०१८-१९ च्या हंगामात एफआरपीच्या थकबाकीपोटी ऊस उत्पादकांना साखर देण्याचे धोरण काही कारखान्यांनी जाहीर केले होते; मात्र त्यासाठी एकही शेतकरी पुढे न आल्याने हे धोरण फसले होते. उत्तर प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे दिसते.उत्तर प्रदेश सरकारने ऊस बिलांची थकबाकी देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतील पैसे दिले होते; यंदा साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, साखर कारखाना महासंघलॉकडाउनच्या काळात एकतर साखरेला उठाव नाही आणि कारखान्याकडून घेतलेली साखर शेतकरी विकणार कोठे, असा प्रश्न आहे. त्यामुळे योगी सरकारने घेतलेला हा निर्णय अयोग्य आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSugar factoryसाखर कारखाने