शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 08:01 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले

ज्युलिओ रिबेरो

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या माणसांसाठी मला अतीव दु:ख झाले. या हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला हे खरे असले, तरी ज्यांनी पूर्वी त्या सुरक्षा दलाचे नेतृत्व केले अशा माझ्यासारख्याचा शोक अंमळ अधिक तीव्र आहे. तीन वर्षांहून थोडा अधिक काळ मुंबईचा पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यानंतर काही आठवड्यांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर माझ्या सेवांची गुजरातमध्ये गरज असल्याचे पंतप्रधानांनी ठरविले.त्याआधी मधल्या फळीत ‘सीआरपीएफ’मध्ये मी हैदराबादमध्ये रेंज जीआयजी म्हणून साडेतीन वर्षे आणि दिल्लीतील मुख्यालयात अडीच वर्षे प्रशासकीय पदांवर काम केले होते. या दलातील बहाद्दर जवानांच्या उत्तम कामगिरीची ज्यांना कल्पना नाही त्यांच्या तुलनेत ज्याने या दलात सहा वर्षे घालविली, त्या माझ्यासारख्याचे अश्रू अधिक अनावर होणे स्वाभाविक आहे.

भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांच्यात एक मूलभूत फरक आहे. लष्कराची भरती प्रामुख्याने लढवय्या मानल्या गेलेल्या जातींच्या युवकांमधून केली जाते व त्यांच्या रेजिमेंटची रचनाही त्यानुसारच केलेली असते. ‘सीआरपीएफ’मध्ये मात्र संपूर्ण देशातून अधिक व्यापक प्रमाणावर भरती केली जाते. प्रत्येक बटालियनमध्ये सर्व राज्ये, समाजवर्ग, सर्व धर्म, सर्व जाती व सर्व भाषांना प्रतिनिधित्व मिळेल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. त्यामुळे अशा बटालियनमधील जवानांची हिंदी किंवा हिंदुस्तानी ही सामायिक भाषा बनते आणि ते समान खाणेपिणे व समान नीतिमूल्यांचे पालन करतात. हे जवान महिनोंमहिने कुटुंबांपासून दूर व बहुतांश वेळा अत्यंत खडतर परिस्थितीत राहत असतात.

या दलातील व्यक्ती ‘सीआरपीएफ’ला ‘चलते रहो प्यारे’ अशा पर्यायी नावाने ओळखतात. याचे कारण असे की देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अशांतता निर्माण झाली की या दलाच्या बटालियनना लगेच तेथे रवाना केले जाते. त्यामुळे या जवानांचे आयुष्य सारखे फिरतीचे असते. येथे आज्ञेचे तत्काळ पालन करण्याचे शिक्षण सुरुवातीपासूनच दिले जाते. कमीतकमी बळाचा वापर करून दहशतवादी घटना किंवा हिंसक जमावाला कसे हाताळायचे याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते. म्हणून पूर्वी मी ज्या दलाला माझे म्हणत होतो त्या सीआरपीएफमधील ४४ प्रशिक्षित व ध्येयनिष्ठ जवान एका ‘फिदायीनी’ने घडवून आणलेल्या स्फोटात मृत्युमुखी पडावेत, याने माझे काळीच पिळवटून गेले.

हे टाळता आले असते का? सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून जायचा होता तो आधीच अधिक सुरक्षित करून घेता आला असता, असे अनेक जण म्हणतील. घरात आरामखुर्चीत बसून असे दोष देणे सोपे आहे. पण या लोकांना असे सांगावेसे वाटते की, असुरक्षित ठिकाणी काम करीत असताना सुरक्षा दलांचे सुरक्षित राहणे बहुधा नशिबावरही अवलंबून असते. दहशतवाद्यांना असे नशीब एकदा लाभले तरी त्यांचे काम फत्ते होऊ शकते! जीवावर उदार होऊन आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यास निघालेल्या व्यक्तीने गुप्तहेरांना चकवा दिला आणि सुरक्षा फळी भेदली की त्याला रोखणे अशक्य असते. दहशतवाद्यांकडून केले जाणारे असे निकराचे प्रयत्न आधी डझनभर वेळा फोल ठरले तरी सुरक्षा व्यवस्थेतील छोटीशी उणीवही त्यांचा तेरावा प्रयत्न यशस्वी होण्यास पुरेशी असते! त्यामुळे अशा धोकादायक परिस्थितीत काम करणाºया सुरक्षा जवानांना अहोरात्र मिनिटागणिक सतर्क राहावे लागते.खास करून सर्वसामान्य नागरिकांकडून असा दु:खावेग उत्स्फूर्त आणि जाहीरपणे व्यक्त होणे हे नक्कीच मानवी करुणेचे व देशप्रेमाचे लक्षण आहे. पण दहशतवाद व बंडखोरांच्या कारवायांमुळे काश्मीर किंवा अन्य काही ठिकाणीही विस्कळीत होणारी समाजजीवनाची घडी एवढ्यानेच सुरळीत होणार नाही. अप्रियतेचा धोका पत्करूनही मला असे सांगावेसे वाटते की, काश्मीरमधील दहशतवाद हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्याची हाताळणीही वेगळ्या पद्धतीनेच केली जायला हवी.पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवादाचा बीमोड करण्याचा त्या वेळचा पंजाब पोलीस दलाचा प्रमुख असलेला अनुभव, १९९८ मध्ये उत्तर आयर्लंडला गेलो असता तेथील दहशतवादाचा पोलिसांनी कसा मुकाबला केला, याची प्रत्यक्ष अधिकाºयांकडून घेतलेली माहिती याआधारे मी खात्रीने असे सांगू शकतो, की ही समस्या फक्त दंडुकेशाहीने कधीही पूर्णपणे सुटू शकणार नाही. अर्थात, हातात बंदूक घेऊन समोर येणाºया बंडखोरांची गय करून चालणार नाही, हे खरे. पण हे दहशतवादी ज्या समाजातून तयार होतात त्या समाजाचे मन जिंकण्यासाठी सोबतच काही केले नाही, तर या बंडखोर प्रवृत्तीला खतपाणी मिळतच राहील आणि एकाला मारला तर त्याच्या जागी त्याच्याहून अधिक कट्टर दहशतवादी येऊन उभा राहील. यामुळे फक्त बळाचा वापर करून हा असंतोष चिरडून टाकण्याच्या धोरणाचा फेरविचार होणे गरजेचे ठरते. एकीकडे ताकदीचा वापर करीत असतानाच दुसरीकडे स्थानिक जनतेमधील चांगुलपणाला साद घालण्याचे कामही करीत राहावे लागेल. हे करताना त्या लोकांकडे शत्रू म्हणून नव्हे, तर या देशाचे सन्मान्य नागरिक म्हणूनच पाहावे लागेल.(लेखक ज्येष्ठ निवृत्त सनदी पोलीस अधिकारी आहेत)

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला