शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:28 IST

माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्हीके सिंग यांनी भारत-चीन वादावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

India-China Dispute : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भारत-चीन सीमावाद अखेर संपुष्टात आला. लडाखच्या सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी एक करार करण्यात आला आहे, ज्याला दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, यावर आता देशाचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. लष्करी स्तरावर पूर्वी काही मतभेद होते, पण आता हे एक चांगले पाऊल उचलले गेले आहे. याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते.'

'भारताचे मोठे यश, पण...'हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी केलेल्या विशेष संवादात जनरल व्ही के सिंह पुढे म्हणतात, 'या करारानंतर दोन्ही सैन्य डेपसांग आणि डेमचोकबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवतील. परंतू मला असे वाटते की, हे भारताचे मोठे यश आहे, पण स्थानिक स्तरावर लागू होण्यास थोडा वेळ लागेल. अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात आपण राहू नये. करारानंतर भविष्यातील रूपरेषा काय असेल, हे आज सांगणे कठीण आहे. त्याचे काही नियम राजनैतिक आणि लष्करी पातळीवर ठरवले जातील.' 

सीमा करारामुळे तणाव कमी होईल का?भारत आणि चीनमधील संबंध प्रदीर्घ काळ तणावपूर्ण होते, परंतु आता दोन्ही देशांनी सीमावादावर काही करार केले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गस्त करार झाला आहे. यामुळे भारतीय सैन्य येथे पुन्हा गस्त घालण्यास सक्षम असेल. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमक झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. पण, आता या करारामुळे सर्वकाही सुरळीत होण्याची शक्यात आहे.

विक्रम मिस्त्री पुढे म्हणाले की, गलवान खोऱ्यातील घटनेनंतर काही गस्त स्थळांवर गस्त बंद करण्यात आली होती, मात्र या ठरावामुळे तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. चीनने काही भागात लष्करी तळही बांधले, ज्यामुळे तणाव आणखी वाढला होता. पण, आता याचे समाधान या ठरावानंतर मिळू शकते. या करारानंतर डेपसांग आणि डेमचोकसारख्या संवेदनशील भागात परिस्थिती सुधारेल. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनVK Singhव्ही के सिंग