शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:28 IST

माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्हीके सिंग यांनी भारत-चीन वादावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

India-China Dispute : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भारत-चीन सीमावाद अखेर संपुष्टात आला. लडाखच्या सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी एक करार करण्यात आला आहे, ज्याला दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, यावर आता देशाचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. लष्करी स्तरावर पूर्वी काही मतभेद होते, पण आता हे एक चांगले पाऊल उचलले गेले आहे. याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते.'

'भारताचे मोठे यश, पण...'हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी केलेल्या विशेष संवादात जनरल व्ही के सिंह पुढे म्हणतात, 'या करारानंतर दोन्ही सैन्य डेपसांग आणि डेमचोकबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवतील. परंतू मला असे वाटते की, हे भारताचे मोठे यश आहे, पण स्थानिक स्तरावर लागू होण्यास थोडा वेळ लागेल. अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात आपण राहू नये. करारानंतर भविष्यातील रूपरेषा काय असेल, हे आज सांगणे कठीण आहे. त्याचे काही नियम राजनैतिक आणि लष्करी पातळीवर ठरवले जातील.' 

सीमा करारामुळे तणाव कमी होईल का?भारत आणि चीनमधील संबंध प्रदीर्घ काळ तणावपूर्ण होते, परंतु आता दोन्ही देशांनी सीमावादावर काही करार केले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गस्त करार झाला आहे. यामुळे भारतीय सैन्य येथे पुन्हा गस्त घालण्यास सक्षम असेल. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमक झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. पण, आता या करारामुळे सर्वकाही सुरळीत होण्याची शक्यात आहे.

विक्रम मिस्त्री पुढे म्हणाले की, गलवान खोऱ्यातील घटनेनंतर काही गस्त स्थळांवर गस्त बंद करण्यात आली होती, मात्र या ठरावामुळे तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. चीनने काही भागात लष्करी तळही बांधले, ज्यामुळे तणाव आणखी वाढला होता. पण, आता याचे समाधान या ठरावानंतर मिळू शकते. या करारानंतर डेपसांग आणि डेमचोकसारख्या संवेदनशील भागात परिस्थिती सुधारेल. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनVK Singhव्ही के सिंग