शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कष्टाचं फळ! सरकारी शाळेत शिक्षण, शेतात केलं काम; जुळ्या मुलांची आई झाली IPS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:21 IST

IPS Saroj Kumari : एक काळ असा होता जेव्हा त्यांना फक्त छोट्या मोठ्या सुखासाठीच नव्हे तर मूलभूत सुविधांसाठीही ध़़डपड करावी लागत होती.

राजस्थानमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या सरोज कुमारी आज देशाच्या प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना फक्त छोट्या मोठ्या सुखासाठीच नव्हे तर मूलभूत सुविधांसाठीही ध़़डपड करावी लागत होती. गुजरातच्या वडोदरा येथील डीसीपी सरोज कुमारी यांनी बालपणात अनेक अडचणींचा सामना केला. सरकारी शाळेत शिकण्यापासून ते आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. जुळ्या मुलांची आई असलेल्या IPS सरोज कुमारी यांची यशोगाथा जाणून घ्या.

सरोज कुमारी यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील चिरावा उपविभागातील बुडानिया गावात बनवारीलाल मेघवाल आणि सेवा देवी यांच्या घरी झाला. बनवारीलाल हे सैन्यातून निवृत्त झाले होते पण त्यांची पेन्शन कमी होती. घर चालवण्यासाठी सरोज कुटुंबासमवेत शेतीत मदत करायच्या. सरोज यांनी गावातील सरकारी शाळेतून आठवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांच्या गावात पुढील शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी अलीपूर गावातल्या सरकारी शाळेत प्रवेश घेतला. 

ही शाळा त्यांच्या गावापासून 6 किमी अंतरावर होती. तिथपर्यंत पोहोचण्याचे साधन नव्हते. त्यामुळे सरोज शाळेत जाण्यासाठी रोज सहा किमी चालत असे. एवढ्या संघर्षातही त्या 12वी बोर्डाच्या परीक्षेत अव्वल ठरल्या. सरोज यांना अभ्यासात खूप रस होता. 12वी टॉपर झाल्यानंतर त्यांनी जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथून शिक्षण घेतल्यानंतर त्या लेक्चरर झाल्या पण आता त्यांना नागरी सेवांमध्ये रस होता. त्यांनी यामध्ये देखील घवघवीत यश संपादन केले. 

IPS सरोज कुमारी यांनी 2019 मध्ये डॉ. मनीष सैनी यांच्याशी विवाह केला. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले आहेत. सरोज यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात त्या पारंपारिक वेशभूषेत दिसल्या होत्या. त्याचे ते फोटो पाहून त्या आयपीएस अधिकारी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी