शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

परिस्थितीची जाणीव! वडील शेतकरी, आई करायची मजुरी; मुलाने IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:57 IST

हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली.

राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदिपक कामगिरी केली आहे, त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती खूप बेताची होती. हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आईला होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं आहे.

हेमंत पारिकचा जन्म राजस्थानमधील विरान तहसील भद्रा जिल्हा हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि  वडील शेतकरी होते. महर्षि दयानंद हायस्कूलमधून हिंदी माध्यमातून त्याने दहावीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. हेमंतने सांगितलं की, "एक दिवस मी घरी होतो आणि आईने मला मिठी मारली आणि रडू लागली, मी विचारलं की काय झालं आई, का रडत आहेस? तेव्हा ती म्हणाली बेटा सरकार आम्हाला २२० रुपये देतं आणि इथे आम्ही दिवसभर काम करतो आणि ५०-६० रुपये मिळतात."

"मला याबद्दल खूप वाईट वाटलं आणि मी ऑफिसला पोहोचलो. काही वेळाने तिथल्या व्यवस्थापकाने मला समजावून सांगितलं की, लोकसंख्या जास्त असल्याने हे करावंच लागेल. अशाप्रकारे, जेव्हा मी त्याला एकदा रेकॉर्ड दाखवायला सांगितलं. तर त्यांच्यापैकी एक म्हणाला की, जास्त कलेक्टर बनू नकोस.... त्यावेळी मला कलेक्टर आणि कंडक्टरमध्ये काय फरक असतो हेही माहीत नव्हते. मी निराश होऊन घरी परतलो. त्याच दिवशी मी ठरवलं की एक दिवस मी कलेक्टर होणार. त्या दिवसानंतर मी UPSC-IAS ची तयारी सुरू केली आणि मला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन मिळत राहिलं. कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात मला शिक्षक आणि इतर मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला."

"मी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालो आणि माझे नाव यादीत होतं. यानंतर मी मुख्य परीक्षेची तयारी केली आणि तीन महिन्यांनी माझा निकाल लागला. त्यानंतर मी पुन्हा मुलाखतीची तयारी सुरू केली. माझी मुलाखत ६ फेब्रुवारी रोजी झाली आणि १६ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा माझं नाव त्या यादीत ८८४ व्या क्रमांकावर होतं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ८८४ मिळवला" असं हेमंतने सांगितलं आहे. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी