शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कडक सॅल्यूट! अपघातात हात-पाय गमावले पण हार नाही मानली; UPSC केली क्लिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 16:03 IST

सूरज इतर मुलांसोबत हसत-खेळत अभ्यास करायचा, पण 2017 मध्ये झालेल्या अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र रात्रंदिवस तासनतास अभ्यास करूनही या परीक्षेचे तीन टप्पे पार करणं फार कठीण आहे. यासाठी उमेदवार कोचिंग, ट्यूशन इत्यादी सुविधांसह अभ्यास करतात, परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हिंमत आणि सहनशक्ती असणं आवश्यक आहे. मैनपुरीच्या सूरजने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

सूरज इतर मुलांसोबत हसत-खेळत अभ्यास करायचा, पण 2017 मध्ये झालेल्या अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. 2017 मध्ये रेल्वे अपघातात सूरजला हात आणि पाय गमवावे लागले. सुरजला चार महिने प्रचंड वेदना होत राहिल्या आणि त्याच्यावर उपचार सुरूच होते. एवढा मोठा अपघात झाल्यानंतरही त्याने कधीच स्वतःला इतरांपेक्षा कमी समजलं नाही.

हात-पाय गमावल्यानंतरही सूरजचा धीर सुटला नाही आणि त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याच्यात इतका उत्साह होता की त्याने ही अवघड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. घरची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आणि काही वेळाने सूरजच्या एका भावाचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब दु:खी झाले होते मात्र सूरजने हिंमत हारली नाही आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूरजने यूपीएससी परीक्षेसाठी कुठूनही कोचिंग घेतलं नाही. घरीच स्वत: अभ्यास करून तो या ध्येयापर्यंत पोहोचला आहे. आपल्या आयुष्यातील भीषण सत्य त्याने स्वीकारलं आहे. या अवघड काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता अनेकांना सूरजकडून प्रेरणा मिळत आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी