शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Success Story: ज्यूस मशीनमध्ये दोन्ही हात गेले, कोपरानं पेपर लिहीला अन् अक्षय बनला वकिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:56 IST

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर स्वकतृत्वानं मात करता येते याचं एक मूर्तीमंत उदाहरण हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील मैडी गावात राहणाऱ्या अक्षयनं दिलं आहे.

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर स्वकतृत्वानं मात करता येते याचं एक मूर्तीमंत उदाहरण हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातील मैडी गावात राहणाऱ्या अक्षयनं दिलं आहे. दिव्यांगपणावर मात करुन अक्षयनं स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर एलएलबीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो वकिल बनला आहे. एका दुर्घटनेत अक्षयला आपले दोन्ही हात गमावावे लागले होते. पण यामुळे खचून न जाता नव्या उमेदीनं अक्षयनं प्रयत्न केले आणि आज त्यानं कोर्टात वकिलीच्या प्रॅक्टीसला सुरुवात केली आहे. 

इयत्ता सातवीत असतानाच अक्षयचे दोन्ही हात ऊसाचा रस काढणाऱ्या मशीनमध्ये गेले होते. २००७ साली अक्षयसोबत ही दुर्घटना घडली होती. अक्षय गंभीररित्या जखमी झाला होता आणि त्याचे दोन्ही हात कोपरापासून कापण्याशिवाय डॉक्टरांपुढे पर्याय नव्हता. सर्वसाधारण कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अक्षयसोबतच त्याच्या आई-वडील आणि भावंडांसाठी हा मोठा धक्का होता. कुटुंबातील हुशार मुलावर अशी वेळ ओढावल्यानं सर्वच धक्क्यात होते. 

कुटुंबीयांना अक्षयच्या भवितव्याची काळजी लागली होती. त्याचवेळी या वेदनादायक अपघातातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षयच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. दोन्ही हातांच्या जखमा भरल्यानंतर अक्षयने पेन धरण्याचा सराव सुरू केला. पेन दोन्ही कोपरांनी धरून कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करत चित्रकलेचा सरावही केला. या काळात त्यानं आपला अभ्यास सुरुच ठेवला होता. 

त्याने माडी येथील हायस्कूलमध्ये दहावीची परीक्षा दिली आणि पेपर लिहिण्यासाठी सहायकाची सेवा घेतली, परंतु परीक्षेत त्याला आवश्यक गुण मिळाले नाहीत. याचं मूळ कारण म्हणजे त्याच्या असिस्टंटने लिहिताना खूप चुका केल्या. यामुळे त्याने पुढच्या वर्गात स्वतःहून लिहायचं ठरवलं आणि नायहरियान येथील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून प्लस टू परीक्षा उत्तीर्ण केली. 

यानंतर वकील अक्षय कुमार यानं मागे वळून पाहिलं नाही. त्यानं महाराणा प्रताप महाविद्यालय, अंब येथे बी.ए.ला प्रवेश घेतला आणि बी.ए.ची परीक्षा ७९ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यानंतर त्यानं एलएलबी करण्याचा निर्णय घेतला आणि हरोली येथील बधेडा येथील हिम कॅप्स लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि मेहनतीच्या जोरावर परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली. आता अक्षयने वकिलीचे काम सुरू केले आहे. 

आपले दोन्ही हात गमावलेला अक्षय कुमार आपल्या दिनक्रमातही इतरांवर अवलंबून नसायचा. कपडे बदलण्यापासून ते अंघोळ, धुणी, पाणी भरणं ही कामं तो स्वतः करतो. याशिवाय घरातील लहान-मोठी कामे करून तो कुटुंबातील सदस्यांना मदतही करतो.

"माझ्यासारख्या हजारो लोकांना एका किंवा दुसर्‍या अपघातात हातपाय गमावून दिव्यांग होऊन जीवन जगावं लागत आहे. पण अशा लोकांनी आयुष्यात हार मानू नये, तर सतत धडपड करून स्वावलंबन आणि स्वाभिमानानं जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे", असं अभिमानानं अक्षय आज सांगतो. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण