शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

फळे, भाज्या वाहतूक, साठवणीसाठी सबसिडी; महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 05:59 IST

शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे.

नितिन अग्रवाल, लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काेराेना आणि लाॅकडाऊनच्या नावाखाली रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. खाद्यान्न पुरावठा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन ग्रीन्स’ अंतर्गत आतापर्यंत १९४ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार, बटाटे, टाेमॅटाे, कांदा यासारख्या अधिसूचित भाज्या आणि फळांची वाहतूक आणि साठवणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही याेजना नाेव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाली हाेती. त्यानंतर मे २०२० मध्ये याेजनेची व्याप्ती वाढवून आणखी भाज्या आणि फळांचा समावेश अधिसूचित  करण्यात आला.

मालवाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदानाचा दावा करणारे शेतकरी आणि संस्थांसाठी ऑनलाइन पाेर्टल सुरू करण्यात आले आहे. देशभरात किसान रेल्वेद्वारे २०२१च्या अखेरपर्यंत या याेजनेतून ५.९८ लाख मेट्रिक टन भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात आली.  त्यावर अनुदानापाेटी १९४.३४ काेटी रुपये देण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंदाची वाहतूक आणि साठवणुकीसाठी नाफेडच्या माध्यमातून ७ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

मजाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये खाद्यान्न प्रक्रियेची साखळी विकसित करण्यासाठी ४० वेअर हाऊस मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची एकूण क्षमता ४६ हजार ३८० मेट्रिक टन एवढी आहे. त्यासाठी ३६३.३० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून १३६.८२ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र