शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी

By देवेश फडके | Updated: February 6, 2021 17:38 IST

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि भारत-चीन सीमावादावर सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे.

ठळक मुद्देभारत-चीन सीमावादावर पंतप्रधानांनी निवेदन द्यावे - सुब्रमण्यम स्वामीशेतकरी आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामीशेतकरी आंदोलन समाप्त करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : देश सध्या दोन मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. एकीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कोअर कमांडर स्तरावरील अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या सर्व परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे. (BJP MP Swamy Statement on India China Border Dispute)

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक निवेदन सादर करणे गरजेचे आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनावर फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शेतकरी आंदोलन समाप्त व्हावे, यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रामुख्याने तीन सूचना केल्या आहेत. कृषी कायदे देशभरात लागू केले जाऊ नयेत. ज्या राज्यांना कृषी कायदे करायचे आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करावा. याशिवाय जी राज्ये हे कायदे लागू करणार नाही, त्यांना यातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवता कामा नये, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त

सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे म्हटले आहे की, आंदोलक शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त असून, ती मान्य केली पाहिजे. धान्य खरेदी कृषी निगडीत व्यापारापर्यंत मर्यादित केली पाहिजे. या सूचना अमलात आणल्यास शेतकरी आंदोलन समाप्त होईल, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. 

'जय श्रीराम'च्या घोषणेने ममता दीदी नाराज का होतात; जेपी नड्डा यांचा थेट सवाल

दरम्यान, गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्या सर्व निष्फळ ठरल्या. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत, तर काही झाले तरी कायदे रद्द करणार नाही. यावर केल्या जाणाऱ्या सूचनांवर विचार केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 

तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmers Protestशेतकरी आंदोलनindia china faceoffभारत-चीन तणावSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपा