शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी

By देवेश फडके | Updated: February 6, 2021 17:38 IST

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि भारत-चीन सीमावादावर सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे.

ठळक मुद्देभारत-चीन सीमावादावर पंतप्रधानांनी निवेदन द्यावे - सुब्रमण्यम स्वामीशेतकरी आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामीशेतकरी आंदोलन समाप्त करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : देश सध्या दोन मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. एकीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कोअर कमांडर स्तरावरील अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या सर्व परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे. (BJP MP Swamy Statement on India China Border Dispute)

सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक निवेदन सादर करणे गरजेचे आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनावर फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शेतकरी आंदोलन समाप्त व्हावे, यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रामुख्याने तीन सूचना केल्या आहेत. कृषी कायदे देशभरात लागू केले जाऊ नयेत. ज्या राज्यांना कृषी कायदे करायचे आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करावा. याशिवाय जी राज्ये हे कायदे लागू करणार नाही, त्यांना यातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवता कामा नये, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त

सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे म्हटले आहे की, आंदोलक शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त असून, ती मान्य केली पाहिजे. धान्य खरेदी कृषी निगडीत व्यापारापर्यंत मर्यादित केली पाहिजे. या सूचना अमलात आणल्यास शेतकरी आंदोलन समाप्त होईल, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे. 

'जय श्रीराम'च्या घोषणेने ममता दीदी नाराज का होतात; जेपी नड्डा यांचा थेट सवाल

दरम्यान, गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्या सर्व निष्फळ ठरल्या. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत, तर काही झाले तरी कायदे रद्द करणार नाही. यावर केल्या जाणाऱ्या सूचनांवर विचार केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 

तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmers Protestशेतकरी आंदोलनindia china faceoffभारत-चीन तणावSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपा