शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Corona Vaccination: “३ दिवसांत कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देसरकारी आदेश निघताच अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे.जर सरकारी कर्मचारी लस घेणार नाहीत तर सर्वसामान्य लोकांवर त्याचा विपरित परिणाम होईल असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतंज्या कर्मचाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी लसीचे डोस घेतले नाहीत त्यांना मे महिन्याचं वेतन देऊ नये

फिरोजाबाद – कोरोना संकटकाळात संसर्गाचा धोका लक्षात घेता सरकारने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने लोक लसीचे डोस घेत आहेत. परंतु फिरोजाबाद येथे अनेक सरकारी विभाग असे आहेत जिथे कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक फर्मान सोडलं आहे की, ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही असा इशाराच दिला आहे.

फिरोजाबाद जिल्हाधिकारी च्रंद्रविजय सिंह यांना माहिती मिळाली की, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीचे डोस घेतले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आदेश काढलेत. त्यात ज्या कर्मचाऱ्यांनी अथवा अधिकाऱ्यांनी लसीचे डोस घेतले नाहीत त्यांना मे महिन्याचं वेतन देऊ नये असं म्हटलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारी आदेश निघताच अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. याबाबत मुख्य विकास अधिकारी चर्चित गौंड यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही अशांना पगार देऊ नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं. जिल्ह्यात असे अनेक कर्मचारी होते ज्यांनी लसीकरण केले नव्हते. जर सरकारी कर्मचारी लस घेणार नाहीत तर सर्वसामान्य लोकांवर त्याचा विपरित परिणाम होईल असं जिल्हाधिकाऱ्यांना वाटतं. त्यामुळे हे आदेश काढल्यानंतर लसीकरण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.

आदेशानंतर लसीकरण केंद्रावर रांगा

जेव्हा आम्ही स्वत: विकास भवनला जाऊन पाहिले तेव्हा कर्मचारी लस घेताना दिसले. आतापर्यंत ज्यांनी लस लावली नव्हती तेदेखील रांगेत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाऊलाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल. त्यातून कोरोना बचावासाठी लसीकरणाचं महत्त्व नागरिकांना पटवून देता येईल असं चर्चित गौंड म्हणाले. तर मी लसीकरण करून आलोय, आतापर्यंत माझी औषधं सुरु असल्याने लस घेतली नव्हती. परंतु मी आता लस घेतली आहे. साहेबांनी जे आदेश दिले ते योग्य असल्याचं ग्रामविकास अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेश