शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Anita Bose: “महात्मा गांधी हे नेताजींसह अनेकांचे प्रेरणास्थान”; अनिता बोस यांचे कंगनाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 11:29 IST

Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली:महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नायक होते. महात्मा गांधी यांनी नेताजींसह अनेकांना प्रेरित केले आहे. महात्मा गांधीजी अनेकांचे प्रेरणास्थान आहेत, या शब्दांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी बॉलिवूड क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्यावर पलटवार केला आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर केलेल्या दोन पोस्टमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, देशभरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे. 

स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या. नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती. भगत सिंग यांच्या फाशीला गांधीजींचा पाठिंबा होता. त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला. मात्र, या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते

महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. परंतु, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले. त्यांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढ्यातील आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सहभागी झाले, ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी, असे अनिता बोस यांनी स्पष्ट केले आहे. 

गांधीजी व नेताजींचे कार्य एकमेकांना पूरक होते

गांधीजी व नेताजींचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य एकमेकांना पूरक होते. फक्त अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळेल असे काँग्रेसला वाटत होते पण, हे खरे नव्हते. नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचे योगदानही मोठे होते, असे स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे असे म्हणता येईल. असे असले तरी फक्त नेताजींमुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणेही चुकीचे ठरेल. कोणा एकामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. महात्मा गांधी यांनी देशातील लाखो लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले होते, अगदी नेताजींनाही, असेही अनित बोस यांनी म्हटले आहे. अनिता बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त करत कंगनावर पलटवार केला.

काय म्हणाली होती कंगना रणौत?

कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीजवर दोन मोठे संदेश पोस्ट करत आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली. गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले होते.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसMahatma Gandhiमहात्मा गांधीInstagramइन्स्टाग्राम