शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुष्काळी भागातील स्थितीचा अभ्यास

By admin | Published: April 29, 2016 5:02 AM

देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी परिस्थितीचा येत्या जूनपर्यंत केंद्रीय पथकांतर्फे अभ्यास करण्यात येईल आणि या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी ही पथके भावी कार्यवाहीसंबंधीची दीर्घकालीन योजना तयार करतील, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) आणि केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी) च्या पथकांना दुष्काळ निर्माण होण्यामागच्या कारणांचे विश्लेषण करणे आणि जलसंसाधनांच्या व्यवस्थापनाच्या आव्हानांची ओळख पटविण्याचे काम देण्यात आले आहे. ही पथके पाण्याच्या संदर्भातील माहिती आणि जलस्रोत पुन्हा भरण्यामधील अंतर शोधून काढेल, दीर्घकालीन उपाययोजना आणि संरक्षणाचे उपाय सुचवेल. त्यासोबतच पाणी वितरण मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या पुनर्स्थापनेबाबत सूचना करेल, असे या निवेदनात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>या पथकांना संभाव्य पर्यायांसाठी दीर्घकालीन कृती योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही पथके एक आठवड्याच्या आत आपला अहवाल सीडब्ल्यूसी आणि सीजीडब्ल्यूबीच्या अध्यक्षांना सादर करतील आणि हे अध्यक्ष आपल्या टिप्पणीसह हा अहवाल जल संसाधन मंत्रालयाकडे पाठवतील. ही प्रक्रिया जून २०१६ पर्यंत चालेल, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.>पाण्याचे संरक्षण, योग्य वापरासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर काम करीत असतात. यात केंद्र सरकार सिंचन आणि जलसंसाधनांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन योजनांच्या माध्यमाने तांत्रिक व आर्थिक सहकार्य करीत असते. >२०१३ साली केंद्रीय भूजल मंडळाने ८५ अब्ज घनमीटर पाण्याच्या भूमिगत संचयनासाठी योजनेचा आराखडा तयार केला होता. याअंतर्गत देशभरात पावसाचे पाणी जमा करण्यासाठी १.१ कोटी कृत्रिम संरचना उभारण्याचा प्रस्ताव होता. हा आराखडा सर्व राज्य सरकारांना पाठविण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.