शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बलात्कार पीडितेची ‘टू-फिंगर’ चाचणी केल्यास कठोर कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:11 IST

केंद्र व राज्य सरकारांना कारवाईचे निर्देश

नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची टू फिंगर चाचणी करण्याची पद्धत आजही सुरू आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ही चाचणी यापुढे केली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारांना देताना ही चाचणी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला. 

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या पीठाने बलात्कार व हत्या प्रकरणातील एका दोषीला निर्दोष मुक्त करण्याचा झारखंड उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना गुन्हेगाराला दोषी ठरवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान टू फिंगर चाचणी अद्यापही सुरू असल्याचे समोर आल्यानंतर न्यायालयाने वरील निर्देश दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने दशकभरापूर्वीच्या एका निर्णयात टू फिंगर चाचणीला स्त्रीची मानमर्यादा आणि खासगीत्वाचे उल्लंघन ठरवले होते. असे असताना ही पद्धत आजही वापरली जातेय ही दुर्दैवी बाब आहे, असे पीठाने म्हटले. पीडित महिलांच्या गुप्तांगाची तपासणी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे. बलात्कारामुळे त्यांना आधीच धक्का बसलेला असतो. या चाचणीमुळे त्यांना पुन्हा धक्का बसतो. लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलेवर बलात्कार होऊ शकत नाही, असे म्हणता येणार नाही, असेही पीठाने म्हटले आहे.

काय म्हटले न्यायालय?

न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेक निर्देश जारी केले. पोलीस महासंचालक आणि आरोग्य सचिवांनाही टू फिंगर चाचणी केली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. ही चाचणी करणाऱ्या व्यक्तीला गैरवर्तनाबद्दल दोषी ठरवले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातून या चाचणीचे संदर्भ वगळावेत, असे निर्देशही कोर्टाने दिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार