शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

आंदोलक शेतकऱ्यांच्या कोरोनापासून बचावासाठी काय केलं?; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

By जयदीप दाभोळकर | Updated: January 7, 2021 14:23 IST

सुनावणीदरम्यान बोलताना न्यायालयानं सरकारी वकिलांना तबलिगी जमातचंही उदाहरण दिलं.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनातदरम्यान एकत्र आलेल्या शेतकऱ्यांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली, न्यायालयाचा सवालन्यायालयाकडून उदाहरण देताना तबलिगी जमातचा उल्लेख

नव्या कृषी कायद्यांविरोधात महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहे. सध्या देशात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. अशा परिस्थितीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचं करोनापासून बचाव करण्यासाठी काय पावलं उचलली आहेत?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून तबलिगी जमातच्या एकत्र आलेल्या लोकांकडून करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं उदाहरणही दिलं.आंदोलन करणारे शेतकरी एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत आंदोलनाच्या स्थळी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत? अशी विचारणा न्यायालयानं केली. तसंच याचं उत्तर देण्यासाठी केंद्राला न्यायालयानं दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. "ठिक अशीच समस्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही निर्माण होऊ शकते. आम्हाला माहित नाही की शेतकऱ्यांना कोरोनापासून वाचवलं जात आहे की नाही. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलीत. तुम्ही तबलिगी जमातच्या अनुभवातून काही बोध घेतला आहे का? तुम्हाला हे कसं झालं हे माहित आहे का?," असे प्रश्न तीन न्यायाधिशांच्या खंडपीठानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केले.तपास अजून सुरू"तबलिगी जमातच्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे," असं तुषार मेहता यांनी सरकारच्यावतीनं न्यायालयाला सांगितलं. तसंच एका ठिकाणी अधिक लोकं उपस्थित असल्याच्या कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करत दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जम्मू काश्मीरच्या वकिल सुप्रिया पंडित यांच्याद्वारे जमात प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा प्रश्न केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संपHaryanaहरयाणाdelhiदिल्ली