शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

'एस दुर्गा' या चित्रपटात महिलेचा संघर्ष आहे, कोणताही आक्षेपार्ह भाग नाही - कन्नन नायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 19:34 IST

एस दुर्गा (मल्याळम चित्रपट) या चित्रपटात कोणताही भाग आक्षेपार्ह नाही. केवळ चित्रपटाच्या पोस्टरवरील नावावरून जो आक्षेप घेतला आहे, त्याला काही अर्थ नाही. केरळ उच्च न्यायालयाने निर्मात्याच्या बाजूने निर्णय दिल्याने इफ्फीमध्ये शेवटच्या टप्प्यात हा चित्रपट दाखवला जाईल.

-  विलास ओहाळ

पणजी : एस दुर्गा (मल्याळम चित्रपट) या चित्रपटात कोणताही भाग आक्षेपार्ह नाही. केवळ चित्रपटाच्या पोस्टरवरील नावावरून जो आक्षेप घेतला आहे, त्याला काही अर्थ नाही. केरळ उच्च न्यायालयाने निर्मात्याच्या बाजूने निर्णय दिल्याने इफ्फीमध्ये शेवटच्या टप्प्यात हा चित्रपट दाखवला जाईल, अशी आपणास आशा असल्याचे मनोगत या चित्रपटातील मुख्य भूमिका करणारा व कबीर पात्र रंगविणारा अभिनेता कन्नन नायर याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.सेक्सी दुर्गावरून एस दुर्गा असे नामकरण झालेल्या आणि 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरामामध्ये निवड होऊनही वादामुळे बाहेर पडलेल्या या चित्रपटाचा नायक नायर हा गोव्यात दाखल झाला आहे. या चित्रपटाविषयी त्याच्याशी गप्पा मारताना तो म्हणाला की, तसे आपण रंगभूमीवरील कलाकार. यापूर्वी 11 चित्रपटांतून छोटय़ा-छोटय़ा भूमिका केल्या. मात्र, सनल कुमार श्रीधरन यांनी या चित्रपटासाठी आपली मुख्य भूमिकेसाठी निवड केली.एस दुर्गा या चित्रपटात महिलेचा संघर्ष दाखविला आहे. दुर्गा म्हणजे लढाऊ पणाचे प्रतिक मानले जाते. कोणत्याही देवाचा किंवा मुलीच्या नावाचाही अपमान करण्याचा हा भागच नाही. उलट या चित्रपटातील दुर्गा ही भूमिका संघर्ष करणारी आहे. दुर्गाला जो भावनिक आधार देण्याचे, बळ देण्याचे काम कबीर करत असतो. त्याचबरोबत तिच्यावर प्रेमही करीत असतो. दुर्गाची भूमिका साकारणारी महाराष्ट्रातील राजश्री देशपांडे या अभिनेत्रीने या भूमिकेला न्याय दिला आहे. चित्रपट पूर्णत: दुर्गा या पात्रच्या भोवती फिरत आहे. विशेष म्हणजे इफ्फीमध्ये ज्युरींनी या चित्रपटाची निवड केली पण तो इफ्फीमध्ये समाविष्ट झाला नाही, याची खंत वाटतेच.केरळच्या लोकांची संख्या इफ्फीमध्ये अधिक असते. या चित्रपटाचा समावेश झाला असता, तर त्यांच्या आनंदातही भर पडली असती, असे सांगत नायर म्हणाला की, विनाकारण लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करून घेतात. अशा पद्धती चुकीची प्रथा पाडणा-या ठरू शकतात. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने उलट या चित्रपटाच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी अजिबात या चित्रपटाला नाकारले नाही, ही या चित्रपटासाठी जमेची बाजू आहे.

टॅग्स :cinemaसिनेमा