शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

By admin | Updated: February 7, 2017 12:52 IST

आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने...

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - आई हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. एक दिवस समजलं की 20 दिवसांपासून तिच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाराच तिचा मुलगा राजू आहे. आई-आणि मुलाची ही घटना फिल्मी आहे पण सत्य आहे. 
 
बिहारच्या  बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा 2009 मध्ये हरवला होता. गावातील एका मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाला तो गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर फुलबडिया पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. मुलगा भेटावा यासाठी त्याच्या आईने अजमेरपासून मुंबईच्या हाजीअली दर्ग्यापर्यंत नवस मागितला, पण तो काही भेटला नाही. हरवल्याच्या 7 वर्षानंतर जानेवारी 2017मध्ये आईला राजू स्वतःच्याच घरात भेटला. 
 
परवीन यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणा-या एका रिक्षावाल्याला बरौनी येथे राजू भटकताना दिसला आणि राजूने काही काम देण्याची त्याला विनंती केली.  त्यावेळी राजू हा परवीन यांचा हरवलेला मुलगा आहे हे त्या रिक्षावाल्याला माहित नव्हतं.  तो रिक्षावाला त्याला आपल्याबरोबर घरी घेऊन आला आणि ते सोबत राहायला लागले.   एक दिवस अचानक परवीन यांनी राजूला पाहिलं आणि बघता क्षणीच त्यांनी  राजूला ओळखलं. मात्र, राजू आपल्या आईला ओळखू  शकला नाही. परवीन यांनी त्याला लहानपणीचा फोटो अल्बम दाखवला त्यानंतर त्याने आपल्या आईला ओळखलं.  
 
जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेलं. इन्जेक्शन आणि औषधं देऊन त्याला एका  ठिकाणी ठेवण्यात आलं. अपहरण करणारा एक व्यक्ती त्याला तू माझा मुलगा आहे असं सांगायचा. कालांतराने राजू सर्वकाही विसरला आणि अपहरण करणा-या दांम्पत्यालाच आपले आई-वडिल मानायला लागला. चार वर्षांनंतर बाहेर खेळताना त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं की त्याचे आई-वडिल खोटं बोलत आहेत आणि त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. हे कळल्यानंतर राजूने तेथून पळ काढला. आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने वाराणसी , अलाहाबाद, भटनी, देवरियासह अनेक स्थानकांवर त्याने रात्र घालवली पण घर सापडलं नाही.    
 
भूक शमवण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल किंवा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा घराच्या शोधात निघायचा . एक दिवस तो बरौनी येथे पोहोचला आणि अरमान या रिक्षावाल्याला भेटला. त्याच्यासोबतच राजू स्वतःच्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले होते त्यामुळे हे आपलंच घर आहे हे त्याला समजत नव्हतं. 
 
पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी 2009 मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचं सांगितलं. आता राजूला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.