शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

By admin | Updated: February 7, 2017 12:52 IST

आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने...

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - आई हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. एक दिवस समजलं की 20 दिवसांपासून तिच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाराच तिचा मुलगा राजू आहे. आई-आणि मुलाची ही घटना फिल्मी आहे पण सत्य आहे. 
 
बिहारच्या  बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा 2009 मध्ये हरवला होता. गावातील एका मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाला तो गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर फुलबडिया पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. मुलगा भेटावा यासाठी त्याच्या आईने अजमेरपासून मुंबईच्या हाजीअली दर्ग्यापर्यंत नवस मागितला, पण तो काही भेटला नाही. हरवल्याच्या 7 वर्षानंतर जानेवारी 2017मध्ये आईला राजू स्वतःच्याच घरात भेटला. 
 
परवीन यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणा-या एका रिक्षावाल्याला बरौनी येथे राजू भटकताना दिसला आणि राजूने काही काम देण्याची त्याला विनंती केली.  त्यावेळी राजू हा परवीन यांचा हरवलेला मुलगा आहे हे त्या रिक्षावाल्याला माहित नव्हतं.  तो रिक्षावाला त्याला आपल्याबरोबर घरी घेऊन आला आणि ते सोबत राहायला लागले.   एक दिवस अचानक परवीन यांनी राजूला पाहिलं आणि बघता क्षणीच त्यांनी  राजूला ओळखलं. मात्र, राजू आपल्या आईला ओळखू  शकला नाही. परवीन यांनी त्याला लहानपणीचा फोटो अल्बम दाखवला त्यानंतर त्याने आपल्या आईला ओळखलं.  
 
जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेलं. इन्जेक्शन आणि औषधं देऊन त्याला एका  ठिकाणी ठेवण्यात आलं. अपहरण करणारा एक व्यक्ती त्याला तू माझा मुलगा आहे असं सांगायचा. कालांतराने राजू सर्वकाही विसरला आणि अपहरण करणा-या दांम्पत्यालाच आपले आई-वडिल मानायला लागला. चार वर्षांनंतर बाहेर खेळताना त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं की त्याचे आई-वडिल खोटं बोलत आहेत आणि त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. हे कळल्यानंतर राजूने तेथून पळ काढला. आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने वाराणसी , अलाहाबाद, भटनी, देवरियासह अनेक स्थानकांवर त्याने रात्र घालवली पण घर सापडलं नाही.    
 
भूक शमवण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल किंवा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा घराच्या शोधात निघायचा . एक दिवस तो बरौनी येथे पोहोचला आणि अरमान या रिक्षावाल्याला भेटला. त्याच्यासोबतच राजू स्वतःच्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले होते त्यामुळे हे आपलंच घर आहे हे त्याला समजत नव्हतं. 
 
पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी 2009 मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचं सांगितलं. आता राजूला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.