शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

By admin | Updated: February 7, 2017 12:52 IST

आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने...

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - आई हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. एक दिवस समजलं की 20 दिवसांपासून तिच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाराच तिचा मुलगा राजू आहे. आई-आणि मुलाची ही घटना फिल्मी आहे पण सत्य आहे. 
 
बिहारच्या  बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा 2009 मध्ये हरवला होता. गावातील एका मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाला तो गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर फुलबडिया पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. मुलगा भेटावा यासाठी त्याच्या आईने अजमेरपासून मुंबईच्या हाजीअली दर्ग्यापर्यंत नवस मागितला, पण तो काही भेटला नाही. हरवल्याच्या 7 वर्षानंतर जानेवारी 2017मध्ये आईला राजू स्वतःच्याच घरात भेटला. 
 
परवीन यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणा-या एका रिक्षावाल्याला बरौनी येथे राजू भटकताना दिसला आणि राजूने काही काम देण्याची त्याला विनंती केली.  त्यावेळी राजू हा परवीन यांचा हरवलेला मुलगा आहे हे त्या रिक्षावाल्याला माहित नव्हतं.  तो रिक्षावाला त्याला आपल्याबरोबर घरी घेऊन आला आणि ते सोबत राहायला लागले.   एक दिवस अचानक परवीन यांनी राजूला पाहिलं आणि बघता क्षणीच त्यांनी  राजूला ओळखलं. मात्र, राजू आपल्या आईला ओळखू  शकला नाही. परवीन यांनी त्याला लहानपणीचा फोटो अल्बम दाखवला त्यानंतर त्याने आपल्या आईला ओळखलं.  
 
जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेलं. इन्जेक्शन आणि औषधं देऊन त्याला एका  ठिकाणी ठेवण्यात आलं. अपहरण करणारा एक व्यक्ती त्याला तू माझा मुलगा आहे असं सांगायचा. कालांतराने राजू सर्वकाही विसरला आणि अपहरण करणा-या दांम्पत्यालाच आपले आई-वडिल मानायला लागला. चार वर्षांनंतर बाहेर खेळताना त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं की त्याचे आई-वडिल खोटं बोलत आहेत आणि त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. हे कळल्यानंतर राजूने तेथून पळ काढला. आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने वाराणसी , अलाहाबाद, भटनी, देवरियासह अनेक स्थानकांवर त्याने रात्र घालवली पण घर सापडलं नाही.    
 
भूक शमवण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल किंवा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा घराच्या शोधात निघायचा . एक दिवस तो बरौनी येथे पोहोचला आणि अरमान या रिक्षावाल्याला भेटला. त्याच्यासोबतच राजू स्वतःच्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले होते त्यामुळे हे आपलंच घर आहे हे त्याला समजत नव्हतं. 
 
पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी 2009 मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचं सांगितलं. आता राजूला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.