शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील', व्हीएचपी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:19 IST

'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील' असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्याने  केलं आहे.

उडुपी - विश्व हिंदू परिषदेतर्फे उडुपी येथे तीन दिवसांच्या धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'लव्ह जिहाद थांबवा, अन्यथा बजरंग दलामधील मुलं मुस्लीम मुलींना पटवतील' असे वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्याने  केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी स्वामी नरेंद्रनाथ यांनी हिंदूंनी हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलावीत असे वक्तव्य केलं होतं. 

व्हीएचपीचे नेता गोपाल यांनी धर्म संसदेमध्ये बोलताना लव्ह जिहादवर आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, जर मुस्लिमांनी लव्ह जिहाद थांबवला नाही तर बजरंग दलातील तरुण मुलं,  मुस्लीम मुलींना पटवतील. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते. गोपाल पुढे म्हणाले की,  मुस्लिमांनी लव्ह जिहाद थांबवायला पाहिजे, आम्ही प्रेमाच्या विरोधात नाही. आमच्या मुली, शाहरुख, सलमान, गिरीश आणि सुनिल यांना एकसारखंच मानतात. हिंदू मुलींना समजत नाही की, हिंदू मुलं फक्त एकवेळाच लग्न करतात, पण मुस्लीम समाजात एकापेक्षा जास्त लग्न केली जातात. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदूनं लव्ह जिहादबद्दल गांभीर्यानं विचार करायला हवा.

हिंदूंनी हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलावीत - स्वामी नरेंद्रनाथ भारतातील हिंदू मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवाद्यांकडून हिंदू समाजाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीने हातात मोबाइल नव्हे तर शस्त्रे उचलायला हवीत, असे विधान हिंदू धर्मगुरू स्वामी नरेंद्रनाथ यांनी कर्नाटकातील उडुपी येथे केले. लाखोंच्या किंमतीचे मोबाइल जवळ बाळगण्याची गरजच काय आहे? सुरक्षा आणि आत्मसंरक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने मोबाइलऐवजी शस्त्रे उचलायला हवीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी आणि त्याबाबत हिंदूंमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हे आवाहन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, धर्म संसदेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उपस्थितांना संबोधित केले होते. 'अयोध्येत राम मंदिरच उभे राहील आणि तिथे असलेल्या शिळांचा वापर करूनच होईल. लवकरच राम मंदिरावर एक भगवा ध्वज फडकताना दिसेल. तो दिवस फार दूर नाही,' असे भागवत म्हणाले होते.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत