शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:43 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अडीच वर्षे दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दिला आहे. राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असे केसरकर यांनी आधी म्हटले होते.  मात्र, आज ते पत्रपरिषदेत ते म्हणाले की, त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी उठून केंद्रावर टीका करत होते. त्यामुळे केंद्रासोबत असलेले संबंध बिघडले. गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होते. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांनी, हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. आमच्यासोबत आलेल्या खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा थेट सवाल त्यांनी उद्धव यांना केला. कालपर्यंत कुठेही न फिरणारे आता फिरू लागलेत. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील कार्यालयात ते किती वेळा गेले आणि काय काम केले? बांधावर जा म्हणून सांगायचे. मग, आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

‘ठाकरेंनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही’  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरू होते. मात्र, १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हे बोलणे थांबले हे खरे आहे का, या प्रश्नासह तीन प्रश्न मी विचारले होते. मात्र, एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाहीत. आज ज्या काही भावना भडकावल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. आज राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याला द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे