शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:02 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.

PM Modi Old Post On Tahawwur Rana: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसेन राणा याला अखेर १६ वर्षांनी भारतात आणण्यात आलं आहे.  कोर्टाने तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा तहव्वुर राणाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करणार आहे. आता तहव्वुर राणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी तहव्वुर राणावर भाष्य केलं होतं.

मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ल्यातून दहशत माजवणाऱ्या तहव्वुर राणाला बऱ्याच प्रयत्नानंतर भारतात आणण्यात आलं आहे. तहव्वुर राणा भारतात येताच, २०११ मध्ये नरेंद्र मोदींनी केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शिकागो न्यायालयाने तहव्वुर राणाला निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका केली होती.

२०११ मध्ये, अमेरिकेने राणाला मुंबई हल्ल्यातील सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवले होते. यावर, तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. "मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याला निर्दोष घोषित करणे हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि ते परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश आहे," असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केले होते.

मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना अमेरिकेने कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केले, असा प्रश्हीन पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता. मुंबई दहशतवादी घटनेतील पीडितांना न्याय हवा आहे. ९/११ च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करू देईल का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर आता २०११ च्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

"आज अमेरिकेच्या शिकागो न्यायालयात दहशतवादी राणाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी, प्रत्येक शक्तीसाठी एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना निर्दोष घोषित करण्याचे धाडस शिकागो न्यायालयाने कोणत्या आधारावर केले? तपास कोणी केला? जिथे ही घटना घडली त्या लोकांची भूमिका काय होती? इथे बळी पडलेल्यांना न्याय कोण देणार? देशाचे पंतप्रधान (मनमोहन सिंग) हे अमेरिकेचे मित्र मानले जातात. ते असताना ही एकतर्फी कारवाई कशी केली जात आहे? आणि आज शिकागो न्यायालयात जे घडले आहे त्यावरून हे स्पष्ट झालं की आता भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवादी त्यांचे सर्व खटले अमेरिकन न्यायालयात चालवले जाणार असं वाटतंय. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे की,९/११ च्या दोषींचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका यासाठी परवानगी देईल का? अमेरिकेतील ९/११ च्या घटनेसाठी भारताची न्यायव्यवस्था जबाबदार असेल का?, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई