शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:02 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.

PM Modi Old Post On Tahawwur Rana: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसेन राणा याला अखेर १६ वर्षांनी भारतात आणण्यात आलं आहे.  कोर्टाने तहव्वुर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा तहव्वुर राणाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करणार आहे. आता तहव्वुर राणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी तहव्वुर राणावर भाष्य केलं होतं.

मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ल्यातून दहशत माजवणाऱ्या तहव्वुर राणाला बऱ्याच प्रयत्नानंतर भारतात आणण्यात आलं आहे. तहव्वुर राणा भारतात येताच, २०११ मध्ये नरेंद्र मोदींनी केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शिकागो न्यायालयाने तहव्वुर राणाला निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका केली होती.

२०११ मध्ये, अमेरिकेने राणाला मुंबई हल्ल्यातील सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवले होते. यावर, तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. "मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याला निर्दोष घोषित करणे हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि ते परराष्ट्र धोरणाचे मोठे अपयश आहे," असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केले होते.

मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना अमेरिकेने कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केले, असा प्रश्हीन पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता. मुंबई दहशतवादी घटनेतील पीडितांना न्याय हवा आहे. ९/११ च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करू देईल का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर आता २०११ च्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. तहव्वुर राणाला भारतात आणल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

"आज अमेरिकेच्या शिकागो न्यायालयात दहशतवादी राणाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी, प्रत्येक शक्तीसाठी एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना निर्दोष घोषित करण्याचे धाडस शिकागो न्यायालयाने कोणत्या आधारावर केले? तपास कोणी केला? जिथे ही घटना घडली त्या लोकांची भूमिका काय होती? इथे बळी पडलेल्यांना न्याय कोण देणार? देशाचे पंतप्रधान (मनमोहन सिंग) हे अमेरिकेचे मित्र मानले जातात. ते असताना ही एकतर्फी कारवाई कशी केली जात आहे? आणि आज शिकागो न्यायालयात जे घडले आहे त्यावरून हे स्पष्ट झालं की आता भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवादी त्यांचे सर्व खटले अमेरिकन न्यायालयात चालवले जाणार असं वाटतंय. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे की,९/११ च्या दोषींचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका यासाठी परवानगी देईल का? अमेरिकेतील ९/११ च्या घटनेसाठी भारताची न्यायव्यवस्था जबाबदार असेल का?, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई