शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:12 IST

संजय शर्मा नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. ...

संजय शर्मा

नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आधीच जल्लोषाचे वातावरण आहे. विजयाचा पूर्ण विश्वास असलेला भाजप नरेंद्र मोदी यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे शक्य होत असल्याचे सांगत आहे. मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर भाजपने सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह पाच टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजपचा मोठा विजय होईल, असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यातील सर्वच नेते आणि उमेदवार दिल्लीत पोहोचू लागले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसत आहे. प्रत्येकाचा असा दावा आहे की, येणार तर मोदीच. सरकार तर भाजपच बनविणार. 

मोदी हॅट्ट्रिक करणार पंतप्रधान मोदींच्या जादू आणि करिष्म्यासमोर सर्व समीकरणे फोल ठरत आहेत. नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा या राज्यातील नेत्यांनी केला आहे. अमित शाह देखील त्यांच्या सभांमध्ये सतत दावा करत आहेत की, एनडीए पाच टप्प्यात ३०० जागा जिंकेल.

तावडेंचा महत्त्वाचा रोलराज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या दौरे, निवडणूक सभा, रोड शो, कार्यक्रम आयोजित करण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ हे करत आहेत. बाहेरून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या नेत्यांना पक्षात घेण्याबाबतचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे करत आहेत. 

कार्यकर्ते व्यवस्थापन...- अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपने ११४ जागांवर संघटनेचे एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरून १०० कार्यकर्ते निवडणूक व्यवस्थापनासाठी पाठवले आहेत.- या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पाठवण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल भाजपच्या ‘वॉर रूम’मधून करत आहेत.

कुठे नुकसान, कुठे लाभ? भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकत आहे.कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांत नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून याची भरपाई केली जाईल, असे बोलले जात आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक 2024