शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:12 IST

संजय शर्मा नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. ...

संजय शर्मा

नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आधीच जल्लोषाचे वातावरण आहे. विजयाचा पूर्ण विश्वास असलेला भाजप नरेंद्र मोदी यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे शक्य होत असल्याचे सांगत आहे. मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर भाजपने सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह पाच टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजपचा मोठा विजय होईल, असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यातील सर्वच नेते आणि उमेदवार दिल्लीत पोहोचू लागले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसत आहे. प्रत्येकाचा असा दावा आहे की, येणार तर मोदीच. सरकार तर भाजपच बनविणार. 

मोदी हॅट्ट्रिक करणार पंतप्रधान मोदींच्या जादू आणि करिष्म्यासमोर सर्व समीकरणे फोल ठरत आहेत. नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा या राज्यातील नेत्यांनी केला आहे. अमित शाह देखील त्यांच्या सभांमध्ये सतत दावा करत आहेत की, एनडीए पाच टप्प्यात ३०० जागा जिंकेल.

तावडेंचा महत्त्वाचा रोलराज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या दौरे, निवडणूक सभा, रोड शो, कार्यक्रम आयोजित करण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ हे करत आहेत. बाहेरून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या नेत्यांना पक्षात घेण्याबाबतचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे करत आहेत. 

कार्यकर्ते व्यवस्थापन...- अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपने ११४ जागांवर संघटनेचे एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरून १०० कार्यकर्ते निवडणूक व्यवस्थापनासाठी पाठवले आहेत.- या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पाठवण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल भाजपच्या ‘वॉर रूम’मधून करत आहेत.

कुठे नुकसान, कुठे लाभ? भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकत आहे.कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांत नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून याची भरपाई केली जाईल, असे बोलले जात आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक 2024