शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्य पातळीवरच काँग्रेस करणार समझोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 07:00 IST

नेतृत्वाच्या वादामुळे राष्ट्रीय आघाडी अशक्य

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय पाळीवर नव्हे, तर राज्य स्तरावरच विविध पक्षांशी काँग्रेस समझोते करणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैटकीत यावर चर्चा झाल्यानंतर आघाड्यांसाठी जी समिती स्थापन केली आहे, तिने राष्ट्रीय पातळीवर समझोते करणे पक्षाच्या हिताचे नाही, असे काँग्रेस नेतृत्वाला सांगितले आहे.निवडणुकांचे जे निकाल येतील, त्याआधारेच काँग्रेसप्रणित आघाडीचा नेता निश्चित करावा, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेतृत्वाबाबत बसपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, जागांबाबत मायवती यांनी केलेले विधान यानंतर राहुल गांधी यांनी अद्याप महाआघाडीच न झाल्याने तिचे नेतृत्व कोण करेल, याची चर्चा करण्यात अर्थ नाही, प्रादेशिक पक्षालाही नेतृत्व मिळू शकते, असेही या नेत्याने स्पष्ट केले.आघाडीचे नेतृत्व आपल्या नेत्याला मिळावे, असे मत व्यक्त करायला प्रादेशिक पक्षांनी सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ममता बॅनर्जी यांचे, तर बसपाने मायावती यांचे नाव पुढे केले आहे. समाजवादी पक्षाने मुलायम सिंग यादव नेते असावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने विविध राज्यांतील आपली ताकद पाहून प्रादेशिक पातळीवर आघाड्या करण्याचे ठरविले आहे.तृणमूल काँग्रेसशी समझोता अशक्यचतेलगू देसम यांच्याशी समझोता व्हावा, असाही काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर मध्य प्रदेशात बसपाशी, बिहारमध्ये राजदशी, उत्तर प्रदेशात बसपा व सपा यांच्याशी, आसाममध्ये बजरुद्दिन अजमल यांच्या नेतृत्वाखालील एआययूडीएफशी तर पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी समझोत्याचा प्रश्न उद्भावत नाही, असे ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही तृणमूलशी समझोता होणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा