शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 06:38 IST

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तडीस लागत नाही. तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले

नवी दिल्ली : राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला ओबीसींचा इम्पिरीकल डाटा उपलब्ध करून दिला नाही. या मुद्यावर राज्य सरकार गंभीर न राहिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गाला (ओबीसी) राजकीय आरक्षणावर पाणी सोडावे लागले, असे रोखठोक मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. पंचायत राज मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबाबत ‘लोकमत’शी बोलताना कपिल पाटील यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने हा मुद्दा कधीच गांभीर्याने घेतला नसल्याचे सांगून पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ओबीसी आयोग स्थापन करण्याला राज्य सरकारने दीड वर्ष घेतले. यानंतर या आयोगाला आर्थिक तरतूद केली नाही. पहिल्यांदा ५ कोटी रुपये दिले. या सर्व प्रकारातून राज्य सरकार गंभीर नव्हते, हे स्पष्ट होते. आता राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. यातून प्रश्न सुटत नाही. कारण जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात तडीस लागत नाही. तोपर्यंत राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मनरेगासाठी निधी कमी नाहीमहाराष्ट्रासाठी मनरेगा योजनेसाठी निधी कमी मिळाल्याचा आरोप खोडून काढून कपिल पाटील म्हणाले की, मनरेगा योजनेसाठी निश्चित निधी नसतो. ज्याप्रमाणे राज्यांकडून मागणी असते त्या प्रमाणात निधी दिला जातो. राज्याच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्राला २,२०० कोटी रुपये मिळाले आहेत. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या मेघालयाला १,५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

अमृत सरोवर योजनादेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ७५ सरोवर (तलाव) तयार करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेली आहे. यानुसार महाराष्ट्रात ३,६०० अमृत सरोवर तयार केले जाणार आहेत. येत्या एक वर्षात या सरोवरांची निर्मिती होईल, असेही कपिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण