शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कमलनाथ सरकारचा वादग्रस्त नसबंदीचा आदेश अखेर मागे, कर्मचाऱ्यांना दिलं होतं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:12 IST

टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने वादग्रस्त नसबंदीबाबतचा आदेश अखेर मागे घेतला आहे. आरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांनी आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. "नसबंदीचा आदेश मागे घेण्यात येत आहे. आम्ही कोणालाही सक्ती करणार नाही आणि  या आदेशाचा अभ्यास करू. तसेच, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक भारद्वाज यांची बदली झाली असून त्यांची सचिवालयात ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", असे तुलसीराम सिलावट यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना बंधनकारक निवृत्ती देणार असेही सांगितले होते. यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. त्यानंतर हा आदेश कमलनाथ सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारच्या या निर्णयाला आणीबाणी 2 म्हटले आहे. "मध्य प्रदेशात अघोषित आणीबाणी आहे. हा काँग्रेसचा आणीबाणी भाग-2 आहे? एमपीएचडब्ल्यूचे काम करण्यात कमी असल्यास सरकारने कारवाई केली पाहिजे, पण लक्ष्य साध्य न केल्यास पगार रोखून निवृत्त करण्याचा निर्णय हुकूमशाही आहे." असे म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी यांनी कमलनाथ सरकारवर टीका केली. 

याशिवाय, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही कमलनाथ सरकारचा हा आदेश म्हणजे इंदिरा गांधींच्या काँग्रेसप्रणित आणीबाणीचा काळ आठवण करून देणारा आहे, अशी टीका कमलनाथ यांच्यावर केली. ते म्हणाले, "आपणास आणीबाणीचा काळ माहिती आहे. तेव्हाची काँग्रेस सरकारची आणीबाणीच्या काळातील नसबंदीची धोरणे अशाच प्रकारची होती. कमलनाथ हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत, त्यामुळे ते अशाप्रकारचे निर्णय घेत आहेत. काँग्रेसशासित सर्व राज्यांची आज हीच स्थिती आहे", असे  संबित पात्रा म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा