शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे सोमवारी उद्घाटन

By admin | Updated: March 21, 2015 00:09 IST

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (दि़२३) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा उद्घाटन समारंभ होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व न्यायाधीश आनंद कारंजकर असणार आहेत, तर या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य आयोगाचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, उषा बोरा, उषा ठाकरे, ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत़या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड़ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे, ॲड़ अविनाश भिडे, ॲड़ बाळासाहेब आडके,ॲड़ किरण चांदवडकर, ॲड़ सुरेश निफाडे, ॲड़ हेमंत गायकवाड, ॲड़ संजय गिते, ॲड़ दीपक ढिकले, ॲड़ जालिंदर ताडगे, ॲड़ माणिक बोडके, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अतुल लोंढे, ॲड़ अजय निकम, ॲड़ विद्येश नाशिककर आदिंनी केले आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--महिन्यातून आठ दिवस कामकाजग्राहकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या खंडपीठात अपील दाखल करता येणार आहे़ २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार क्षेत्रातील दावे या ठिकाणी चालविले जाणार असून, या परिक्रमा खंडपीठाचे कामकाज महिन्यातून आठ दिवस नाशिकच्या खंडपीठात चालेल़ या खंडपीठापुढे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्‘ातील तक्रारींचे कामकाज या खंडपीठात चालणार असून, ग्राहक व वकील यांचा मुंबईला जावे लागणार नसल्याने वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे़