शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे सोमवारी उद्घाटन

By admin | Updated: March 21, 2015 00:09 IST

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (दि़२३) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा उद्घाटन समारंभ होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व न्यायाधीश आनंद कारंजकर असणार आहेत, तर या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य आयोगाचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, उषा बोरा, उषा ठाकरे, ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत़या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड़ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे, ॲड़ अविनाश भिडे, ॲड़ बाळासाहेब आडके,ॲड़ किरण चांदवडकर, ॲड़ सुरेश निफाडे, ॲड़ हेमंत गायकवाड, ॲड़ संजय गिते, ॲड़ दीपक ढिकले, ॲड़ जालिंदर ताडगे, ॲड़ माणिक बोडके, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अतुल लोंढे, ॲड़ अजय निकम, ॲड़ विद्येश नाशिककर आदिंनी केले आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--महिन्यातून आठ दिवस कामकाजग्राहकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या खंडपीठात अपील दाखल करता येणार आहे़ २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार क्षेत्रातील दावे या ठिकाणी चालविले जाणार असून, या परिक्रमा खंडपीठाचे कामकाज महिन्यातून आठ दिवस नाशिकच्या खंडपीठात चालेल़ या खंडपीठापुढे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्‘ातील तक्रारींचे कामकाज या खंडपीठात चालणार असून, ग्राहक व वकील यांचा मुंबईला जावे लागणार नसल्याने वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे़