शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे सोमवारी उद्घाटन

By admin | Updated: March 21, 2015 00:09 IST

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (दि़२३) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा उद्घाटन समारंभ होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व न्यायाधीश आनंद कारंजकर असणार आहेत, तर या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य आयोगाचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, उषा बोरा, उषा ठाकरे, ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत़या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड़ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे, ॲड़ अविनाश भिडे, ॲड़ बाळासाहेब आडके,ॲड़ किरण चांदवडकर, ॲड़ सुरेश निफाडे, ॲड़ हेमंत गायकवाड, ॲड़ संजय गिते, ॲड़ दीपक ढिकले, ॲड़ जालिंदर ताडगे, ॲड़ माणिक बोडके, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अतुल लोंढे, ॲड़ अजय निकम, ॲड़ विद्येश नाशिककर आदिंनी केले आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--महिन्यातून आठ दिवस कामकाजग्राहकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या खंडपीठात अपील दाखल करता येणार आहे़ २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार क्षेत्रातील दावे या ठिकाणी चालविले जाणार असून, या परिक्रमा खंडपीठाचे कामकाज महिन्यातून आठ दिवस नाशिकच्या खंडपीठात चालेल़ या खंडपीठापुढे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्‘ातील तक्रारींचे कामकाज या खंडपीठात चालणार असून, ग्राहक व वकील यांचा मुंबईला जावे लागणार नसल्याने वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे़