शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्टार्टअप्सच्या सवलती कागदावरच; कंपन्यांना प्रत्यक्ष लाभ नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 05:32 IST

बहुतांश सगळी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्टार्टअप कंपन्यांना अनेक सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. तथापि, अनेक पातळ्यांवर अडथळे असल्यामुळे या सर्व सोयी-सवलती केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत.

नवी दिल्ली : बहुतांश सगळी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्टार्टअप कंपन्यांना अनेक सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. तथापि, अनेक पातळ्यांवर अडथळे असल्यामुळे या सर्व सोयी-सवलती केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत. प्रत्यक्ष कंपन्यांना त्यांचा लाभ मिळेनासा झाला आहे. जाचक अटींमुळे सरकारकडून व्यवसाय मिळणेही अशक्य झाले आहे.विविध प्रकारच्या इनक्युबेशन सुविधा, सुरुवातीच्या काळात भांडवल उपलब्ध करून देणे आणि प्रसंगी कंपन्यांना पूरक, अशी खास धोरणे आखणे अशा विविध सोयी-सवलती सरकारांनी स्टार्टअप कंपन्यांसाठी जाहीर केल्या आहेत. तथापि, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनेक जाचक आणि विसंगत अटीही आहेत. अशा अनेक जाचक अटींमुळे स्टार्टअप कंपन्या सरकारी सोयी-सवलतींपासून दूर राहत आहेत. स्टार्टअप इंडियाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, स्टार्टअप कंपन्या आणि अनुभवी कंपन्या यांना समान संधी उपलब्ध करून देण्यात २३ राज्ये आणि ३ केंद्र शासित प्रदेश अपयशी ठरले आहेत.प्रक्रिया जुनाटचईवायचे भागीदार अंकुर पाहवा यांनी सांगितले की, आयओटी आणि स्मार्ट ग्रीडसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत निविदा पात्रता सोपी करणे साह्यभूत ठरेल. डॉक्सवॉलेटचे सीईओ अविरा थरकन यांनी सांगितले की, निविदाविषयक प्रक्रिया अत्यंत जुनाट असून, ती स्टार्टअप कंपन्यांना अजिबात पूरक नाही. ही प्रक्रिया संपूर्णत: रद्दबातल करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Indiaभारत