शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उद्यापासून  NDA च्या खासदारांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 23:13 IST

पहिल्या दिवशी एनडीएच्या खासदारांच्या दोन ग्रुपची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या विरोधात रणनीती बनवण्यासाठी बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या खासदारांच्या ११ ग्रुपच्या बैठकांची मालिका उद्या म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी एनडीएच्या खासदारांच्या दोन ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीत खासदारांकडून त्यांच्या भागातील समस्यांसह विकासकामांची माहिती घेतली जाणार असून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

संध्याकाळी ६.३० वाजता दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिल्या ग्रुपची बैठक होणार आहे. ज्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, ब्रज क्षेत्र, कानपूर क्षेत्र आणि बुंदेलखंडमधील ४२ खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित राहू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत खासदारांना भविष्यातील रणनीतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.

दुसरी बैठक संध्याकाळी ७.३० वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. ज्यामध्ये तीन राज्यांतील (ओडिशा, झारखंड आणि बंगाल) ४१ खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीबाबत समन्वयासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये एकूण ३३८ खासदारांचे एकूण ११ ग्रुप तयार करण्यात आले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये सुमारे ३०-४० खासदार आहेत. खासदारांचे हो ग्रुप्स प्रादेशिक तत्त्वावर तयार करण्यात आले आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी या खासदारांकडून त्यांच्या भागातील समस्या आणि विकासकामांबाबत अभिप्राय घेतील आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत.

एनडीएची बैठकीत ३८ पक्षांचे नेते झाले होते  सहभागीनुकतीच एनडीएची बैठक झाली, ज्यामध्ये एकूण ३८ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैकठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, विरोधक आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण देशातील जनता सर्व काही पाहत आहे. विरोधक का एकत्र येत आहेत, हे त्यांचे ध्येय नसून मजबुरी आहे, हे जनतेला माहीत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा